सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी गावात गेल्या ४६ वर्षांपासून मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक ठरलेली ही अनोखी परंपरा आजही अबाधित सुरू आहे. हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रित येऊन गणेशोत्सव साजरा करतात, तर एकमेकांच्या सणांमध्येही सामील होतात. १९८० साली सुरू झालेली ही परंपरा आज देशासाठी ऐक्याचा आदर्श ठरत आहे.












