Protest March on Rashtriya Swayamsevak Sangh : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांचे एपस्टीन फाईलमध्ये ( Epstein File) नाव आले आहे. त्यामुळे अशा प्रकारचा प्रधानमंत्री देशाला नको, अशा शब्दात टीका करतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) मुख्यालयावर विशाल जनआक्रोश मोर्चा (Jan Akrosh Morcha) काढला.
या मोर्चात वंचित बहुजन आघाडीसहित काँग्रेसही सहभागी झाली होती. या मोर्चात वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshavardhan Sapkal) सहभागी झाले होते.
हे ही वाचा: युद्धाची धडधड; शेअर बाजाराची पडझड
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात जोरदार घोषणाबाजी
यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्र सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चात सहभागी झालेल्यांच्या हातात मोदी, संघाला विरोध दर्शनवणारे बॅनर्स होते. जनआक्रोश मोर्चा सुरू होण्याआधी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. हर्षवर्धन सपकाळ यांनीदेखील सरकारच्या नीतीवर टीका केली.
नरेंद्र मोदी गप्प का आहेत?
सध्या परदेशात जे काही सुरू आहे, त्यावर नरेंद्र मोदी गप्प का आहेत? असा सवाल या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला. तसेच, भारताचे सार्वभौमत्त्व मोदी यांनी अमेरिकेपुढे गहाण ठेवलं आहे, अशी टाकाही या मोर्चात करण्यात आली.
मोदींचे नाव एपस्टीन फाईलमध्ये
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे नाव एपस्टीन फाईलमध्ये आलेले आहे, असा दावा करत याबाबतचा जाब विचारण्यासाठीच हा मोर्चा आयोजित करण्यात आल्याचे वंचितने सांगितले.एपस्टीन फाईलवाला प्रधान मंत्री देशाला नको आहे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या पूर्वीही बहुजन संघटनांनी काढला होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर मोर्चा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नितीविरोधात या पूर्वीही बहुजन संघटनांनी मोर्चा काढला होता. ६ ऑक्टोबर २०२२ ला भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढला होता.
२२ फेब्रुवारी २०२६ लाही काढला होता मोर्चा
त्यानंतर वंचित बहुजन आघाडीनेच औरंगाबाद येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता.
२२ फेब्रुवारी २०२६ रोजी पुन्हा एकदा वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता. त्यानंतर पुन्हा एकदा आता वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे.












