Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • औरंगाबाद नव्हे आता छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक! नाव बददल्यानंतर कोणते बदल होणार?
ताज्या बातम्या

औरंगाबाद नव्हे आता छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक! नाव बददल्यानंतर कोणते बदल होणार?

छत्रपती संभाजीनगर

राज्यातील ऐतिहासिक औरंगाबाद शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याच्या तीन वर्षांनंतर, रेल्वेनंही आता अधिकृतपणे हा बदल लागू केला आहे. दक्षिण मध्य रेल्वेनं शनिवारी औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव आता छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असं ठेवण्याची घोषणा केली. स्थानकाचा नवीन कोड “CPSN” आहे. रेल्वेने म्हटले आहे की या नाव बदलण्याची औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि लवकरच सर्व प्लॅटफॉर्मवरील चिन्हं, वेळापत्रकं, तिकीट प्रणाली आणि डिजिटल डिस्प्ले बोर्डवर हे नवीन नाव दिसेल.

2022 मध्ये बदललं शहराचं नाव

भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) नेतृत्वाखालील महायुती सरकारनं 15 ऑक्टोबर रोजी एक राजपत्र अधिसूचना जारी करुन औरंगाबाद स्थानकाचं नाव बदलण्याची प्रक्रिया औपचारिकपणे सुरु केली. मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती आणि त्यांच्या शौर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारनं 2022 मध्ये औरंगाबाद शहराचं नाव बदलण्यास आधीच मान्यता दिली होती, परंतु रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याच्या प्रक्रियेसाठी केंद्रीय मंत्रालयांची मान्यता आणि अनेक प्रशासकीय औपचारिकता पूर्ण करणं आवश्यक आहे. ही प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.

रेल्वे स्थानकाचा इतिहास

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाची स्थापना 1900 मध्ये झाली, जेव्हा हैदराबादचे सातवे निजाम मीर उस्मान अली खान यांच्या कारकिर्दीत रेल्वे सेवा सुरु झाली. तेव्हापासून, हे स्थानक मराठवाडा प्रदेशासाठी एक प्रमुख प्रवासी केंद्र राहिलं आहे. छत्रपती संभाजीनगर अजूनही एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. अजिंठा आणि वेरूळ लेणी, तसंच बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला आणि पाणचक्की यासारख्या ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. नामांतरामुळं, शहर आणि स्थानक दोन्ही मराठा अभिमानानं अधिक मजबूत होतील.

राजकीय आणि सांस्कृतिक संदेश

या नाव बदलाकडे सांस्कृतिक ओळख म्हणून पाहिलं जात आहे. भाजपा आणि महायुती सरकार याला “इतिहास मराठा अभिमानाशी जोडण्याच्या दिशेनं” एक मोठं पाऊल म्हणत आहेत. त्याच वेळी, विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की असे बदल प्रतीकात्मक आहेत आणि स्थानिक विकासाकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts