इराई धरणाचे सात दरवाजे उघडले गेले आहेत. त्यामुळे इराई आणि वर्धा नदीला पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नदीकाठी असलेल्या पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, यासह इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आव्हाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.