158
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे दहिसर टोलनाका शहराबाहेर 2 किमी पुढे हलवण्याची मागणी केली आहे. सध्या टोलनाक्यामुळे मीरा-भाईंदरमधील 15 लाखांहून अधिक नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडी आणि इंधनाचा अपव्यय सहन करावा लागत आहे. टोलनाका पुढे नेल्याने प्रवास सोपा होईल आणि प्रदूषणही कमी होईल, असा विश्वास आहे. उपमुख्यमंत्री लवकरच या विषयावर बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून येत आहे.









