मुंबई : केंद्र सरकारनं नवीन जीएसटी दरांमध्ये केलेली कपात आज मध्यरात्री 12:00 वाजेपासून लागू झाली आहे. आज 22 सप्टेंबर रोजी, नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ग्राहकांना याचा फायदा होईल. सरकारी घोषणेनुसार एसी, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, दुग्धजन्य पदार्थ आणि पॅकेज केलेले पाणी आता पूर्वीपेक्षा स्वस्त होईल. अमूल आणि मदर डेअरीनंही त्यांच्या उत्पादनांच्या किमती कमी केल्या आहेत. तसंच रेल्वे मंत्रालयानंही रेल नीरच्या पाण्याच्या बॉटलची किंमतही कमी केली आहे.
किती रुपयांना मिळेळ रेल नीर :
रेल्वे बोर्डानं जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, आजपासून 1 लिटर रेल नीर आता 14 रुपयांना (पूर्वी 15 रुपयांना) उपलब्ध होईल. तर 500 मिली पाण्याची बाटली आता 9 रुपयांना (पूर्वी 10 रुपयांना) उपलब्ध आहे. रेल्वे स्थानकं आणि गाड्यांमध्ये विकल्या जाणाऱ्या निवडक पॅकेज केलेल्या पाण्यावर हे नवीन दर लागू होतील. तज्ञांचं म्हणणे आहे की इतर पॅकेज केलेल्या पाण्याच्या कंपन्या देखील लवकरच किमती कमी करु शकतात. जीएसटी कौन्सिलनं या महिन्याच्या सुरुवातीला कर दर कमी करण्याचा निर्णय घेतला. आता 5 टक्के आणि 18 टक्के स्लॅब लागू होतील.
या महिन्याच्या सुरुवातीला, जीएसटी कौन्सिलनं कर दर कमी करण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन स्लॅब तयार करण्यात आले. चांगली बातमी अशी आहे की अनेक कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांवर किमती कमी करण्याची घोषणा आधीच केली आहे. तर, जर ट्रेनमधील एखादा विक्रेता तुम्हाला 14 रुपयांना पाण्याची बाटली देत नसेल तर तक्रार कशी करावी ते जाणून घ्या आणि जर विक्रेता तुम्हाला रेल नीरऐवजी वेगळं पाणी देत असेल तर काय करावं?
रेल नीरच्या एमआरपीमध्ये कपातीची घोषणा :
रेल्वे मंत्रालयानं पॅकेज केलेल्या पाण्याच्या एमआरपीमध्ये कपात करण्याची घोषणा केली. रेल्वे बोर्डानं जारी केलेल्या परिपत्रकानुसार, रेल नीरच्या एक लिटर बाटलीची किंमत 15 रुपयांवरुन 14 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे, तर 500 मिली बाटलीची किंमत 10 रुपयांवरुन 9 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. रेल्वे स्थानक परिसरात आणि गाड्यांमध्ये विकल्या जाणाऱ्या इतर निवडक पॅकेज केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांना देखील हे नवीन दर लागू होतील.
जर एखादा विक्रेता 14 रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारत असेल तर :
– सर्वप्रथम त्या विक्रेत्याला नम्रपणे विचारा की पाण्याची बाटली 14 रुपयांना का मिळत नाही. जर तरीही ती उपलब्ध झाली नाही, तर तुम्ही रेल्वेच्या ग्राहक सेवा चॅनेलद्वारे तक्रार दाखल करु शकता.
– तक्रार दाखल करण्यासाठी तुम्ही आयआरसीटीसी कस्टमर केअर 139 (रेल्वे हेल्पलाइन नंबर) वर देखील कॉल करु शकता.
– तुम्ही रेल्वे स्टेशन मास्टरशी देखील संपर्क साधू शकता. तसंच तुम्ही रेल्वे तक्रार पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल करू शकता.
– तुम्ही रेल मदत अॅप वापरून देखील मदत घेऊ शकता. तक्रार दाखल करताना, पाण्याच्या बाटलीचा फोटो, पावती आणि स्टेशनचं नाव समाविष्ट करणं आवश्यक आहे.
जर कोणी रेल नीरपेक्षा जास्त शुल्क आकारत असेल किंवा तुम्हाला रेल नीरऐवजी दुसरे पाणी देत असेल, तर काय करावं :
– प्रथम विक्रेत्याला नम्रपणे विचारा की तुम्हाला 14 रुपयांना पाणी का मिळत नाही.
– तरीही समस्या कायम राहिल्यास स्टेशन मास्टर किंवा रेल्वे हेल्पलाइन 139 वर तक्रार करा.
– ऑनलाइन तक्रारीसाठी रेल मदत अॅप किंवा रेल्वे तक्रार पोर्टल वापरा. तक्रार दाखल करताना, बाटलीचा फोटो, पावती आणि स्टेशनचे नाव नक्की समाविष्ट करा.
– नेहमी सीलबंद बाटल्या खरेदी करा आणि नियमांचे पालन करा याची खात्री करा.
– जर ते दुसरं पाणी असेल आणि तुम्हाला फक्त रेल नीर हवं असेल, तर बाटली स्पष्टपणे नाकारा आणि ₹14 मध्ये रेल नीर मागवा.
– जर समस्या कायम राहिली, तर तुम्ही स्टेशन मास्टरकडे किंवा वर नमूद केलेल्या हेल्पलाइनद्वारे तक्रार दाखल करू शकता.
प्रवासादरम्यान बाटली खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा:
– नेहमी सीलबंद बाटली खरेदी करा.
– ही माहिती इतर प्रवाशांसोबत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ₹14 मध्ये रेल नियरचा फायदा घेता येईल.
– रेल्वे नियमांचं उल्लंघन झाल्यास अधिकाऱ्यांना तक्रार करणं हा सर्वोत्तम मार्ग आहे.