Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • अहमदाबाद कसोटीत टीम इंडियाचा दणदणीत विजय; अढीच दिवसांत कॅरोबियन संघाला चारली धूळ
Top News

अहमदाबाद कसोटीत टीम इंडियाचा दणदणीत विजय; अढीच दिवसांत कॅरोबियन संघाला चारली धूळ

अहमदाबाद : भारतीय क्रिकेट संघानं पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 140 धावांनी पराभव केला. या सामन्यात वेस्ट इंडिजचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. या विजयासह, भारतीय संघानं दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारतीय संघाकडून रवींद्र जडेजा, केएल राहुल आणि ध्रुव जुरेल यांनी दमदार शतकं झळकावली, तर मोहम्मद सिराजनं शानदार गोलंदाजी केली. हे चार खेळाडू भारतीय संघाच्या विजयात सर्वात मोठे हिरो ठरले.

वेस्ट इंडिजचे फलंदाज फ्लॉप :

पहिल्या डावात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही. तेगनारायण चंद्रपॉल धाव न घेता पॅव्हेलियनमध्ये परतला अन् संघाची सुरुवात खराब झाली. विंडीजकडून जस्टिन ग्रीव्हजनं सर्वाधिक 32 धावा केल्या, ज्यामुळं संघाला 100 धावांचा टप्पा गाठता आला. इतर कोणताही खेळाडू सातत्यपूर्ण फलंदाजी करु शकला नाही. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीमुळं वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना धावा काढण्यात अडचण येत होती. सिराजनं सर्वाधिक चार बळी घेतले. दरम्यान, जसप्रीत बुमराहनं त्याच्या उत्कृष्ट यॉर्करसह तीन बळी घेतले. तर कुलदीप यादवनं दोन बळी घेतले.

भारताच्या तीन फलंदाजांनी झळकावली शतकं :

यानंतर भारताच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना एकही संधी दिली नाही. भारतीय संघाकडून सलामीवीर केएल राहुल (100 धावा), ध्रुव जुरेल (125 धावा) आणि रवींद्र जडेजा (104 धावा) यांनी शतकं झळकावली. शुभमन गिलनंही 50 धावा केल्या. यशस्वी जैस्वालही चांगल्या लयीत दिसत होता, पण तो 36 धावा करत आपला डाव वाढवू शकला नाही. या खेळाडूंनी पहिल्या डावात 5 गडी गमावून 448 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसनं दोन विकेट्स घेतल्या.

वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या डावात जडेजाच्या चार विकेट्स :

यानंतर दुसऱ्या डावातही वेस्ट इंडिजच्या फलंदाजांच्या खराब फॉर्ममध्ये सुधारणा झाली नाही आणि संघानं फक्त 46 धावांमध्ये पाच विकेट्स गमावल्या. यामुळंच त्यांचा पराभव निश्चित झाला. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजकडून अ‍ॅलिक अथानाझेनं सर्वाधिक 38 धावा केल्या. जस्टिन ग्रीव्हजनं 25 धावा केल्या. शेवटी जेडेन सील्सनं 12 चेंडूत 22 धावा केल्या, ज्यामध्ये एक चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. पण हे खेळाडू संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत आणि संपूर्ण संघ केवळ 146 धावा करु शकला. भारताकडून रवींद्र जडेजानं दुसऱ्या डावात चार विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजनं तीन विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवने दोन आणि वॉशिंग्टन सुंदरनं एक विकेट घेतली.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts