Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • निवडणुकांनंतर टांझानियात हिंसाचार, 700 जणांच्या मृत्यूचा दावा; इंटरनेट बंद, सैन्य रस्त्यावर
वर्ल्ड

निवडणुकांनंतर टांझानियात हिंसाचार, 700 जणांच्या मृत्यूचा दावा; इंटरनेट बंद, सैन्य रस्त्यावर

Tanzania post-election violence 2025 : टांझानियाच्या वादग्रस्त सार्वत्रिक निवडणुकांनंतर झालेल्या हिंसाचारात 700 हून अधिक लोकांचा बळी गेल्याचा दावा करण्यात आला आहे. विरोधी पक्ष चाडेमानं शुक्रवारी सांगितलं की देशभरात झालेल्या संघर्षात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर संयुक्त राष्ट्रांनी विश्वसनीय सूत्रांचा हवाला देऊन दहा जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.

अंदाजे 700 जणांचा मृत्यू : चाडेमाचे प्रवक्ते जॉन किटोका म्हणाले की, एकट्या दार एस सलाममध्ये अंदाजे 350 आणि म्वांझा प्रदेशात 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इतर भागांसह, ही संख्या अंदाजे 700 पर्यंत पोहोचते. पक्षाचं म्हणणं आहे की ही आकडेवारी रुग्णालयांच्या भेटींवर आधारित आहे. सरकारनं अद्याप कोणतेही अधिकृत आकडे जाहीर केलेले नाहीत. काही तुरळक घटनांनंतर कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

निवडणूकादरम्यान हिंसाचार : बुधवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रपती सामिया सुलुहू हसन आणि त्यांच्या पक्षाच्या, चामा चा मापिंडुझी (सीसीएम) च्या बाजूनं मतदानात धाडस करण्यात आल्याचा आरोप होत आहे. निकाल जाहीर होताच, दार एस सलाम, म्वांझा, डोडोमा आणि इतर अनेक शहरांमध्ये लोक रस्त्यावर उतरले. पोस्टर्स फाडण्यात आले, पोलीस ठाण्यांवर हल्ले झाले आणि पोलिसांशी संघर्ष सुरु झाला. काही तासांतच वातावरण इतकं हिंसक झालं की ते निवडणुकीच्या उत्सवापेक्षा युद्धभूमीसारखे वाटू लागले.

इंटरनेट सेवा बंद (Tanzania post-election violence 2025) :

परिस्थिती बिकट होत असताना, सरकारनं इंटरनेट बंद केले आणि कर्फ्यू लावला. एएफपीच्या मते, शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही इंटरनेट बंद राहिलं. परदेशी पत्रकारांना वार्तांकन करण्याची परवानगी नव्हती. दार एस सलाम आणि डोडोमा येथील रहिवाशांनी रस्ते रिकामे, टायर जळत असल्याचं आणि पोलीस आणि लष्करी वाहनं फिरत असल्याचं सांगितलं. लष्करप्रमुख जनरल जेकब मकुंडा यांनी निदर्शकांना “गुन्हेगार” म्हटलं आणि स्पष्ट केलं की सैन्य “कायदा आणि सुव्यवस्था पुनर्संचयित करेल”. एपी अहवालात म्हटलं आहे की राजधानीत शेकडो निदर्शक पोलिसांशी भिडले, ज्यामुळे सैन्याला हस्तक्षेप करावा लागला.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts