Jagannath Rath Yatra 2026: आज, १६ जुलै रोजी जगन्नाथ पुरी रथयात्रेला सुरुवात झाली असून लाखो भाविक या भव्य सोहळ्यात सहभागी झाले आहेत. या रथयात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांना भव्य रथांमध्ये विराजमान करून नेमकं कुठे नेलं जातं, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. चला, जाणून घेऊया या परंपरेमागील धार्मिक महत्त्व आणि त्यामागचं खरं कारण.
ओडिशातील पुरी (Odisha Puri) येथे आज (१६ जुलै) भगवान जगन्नाथांच्या भव्य रथयात्रेला (Jagannath Rath Yatra 2026) प्रारंभ झाला आहे. आषाढ शुल्क द्वितीयेला सुरू होणारा हा उत्सव हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या आणि प्राचीन धार्मिक परंपरांपैकी एक मानला जातो. दरवर्षी लाखो भाविक या सोहळ्याला उपस्थित राहून भगवान जगन्नाथ, बालभद्र आणि सुभद्रा यांच्या दर्शनाचा (Jagannath Temple) लाभ घेतात.
हेहा वाचा: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेस आजपासून पुन्हा धावणार
भगवान जगन्नाथ रथातून नेमकं कुठे जातात?
रथयात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ (Lord Jagannath), त्यांचे मोठे बंधू भगवान बालभद्र (Lord Balabhadra) आणि बहीण देवी सुभद्रा (Goddess Subhadra) हे तीन स्वतंत्र रथांमधून मुख्य मंदिरातून गुंडिचा मंदिराकडे प्रस्थान करतात. धार्मिक मान्यतेनुसार, गुंडिचा मंदिर हे भगवानांच्या मावशीचे घर मानले जाते. दरवर्षी भगवान आपल्या भक्तांच्या भेटीसाठी मंदिराबाहेर येतात आणि काही दिवस गुंडिचा मंदिरात मुक्काम करतात.
रथयात्रेचे धार्मिक महत्त्व
जगन्नाथ रथयात्रा ही केवळ एक धार्मिक मिरवणूक नसून समानता, भक्ती, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारा उत्सव आहे. या दिवशी भगवान स्वतः मंदिराबाहेर येऊन सर्व भक्तांना दर्शन देतात. त्यामुळे मंदिरात प्रवेश न मिळणाऱ्या भाविकांनाही भगवानांचे दर्शन घेण्याची संधी मिळते. ही परंपरा सर्वसमावेशकतेचे प्रतीक मानली जाते.
रथाची दोरी ओढण्यामागील श्रद्धा
रथयात्रेतील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे भगवानांच्या रथाची दोरी ओढणे. धार्मिक श्रद्धेनुसार, रथाची दोरी ओढल्याने पुण्य प्राप्त होते, पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो. त्यामुळे लाखो भाविक या सेवेत सहभागी होण्यासाठी उत्सुक असतात.
हा उत्सव किती दिवस चालतो?
रथयात्रेनंतर भगवान गुंडिचा मंदिरात काही दिवस वास्तव करतात. त्यानंतर २४ जुलै रोजी बाहुडा यात्रा काढली जाते, ज्यामुळे भगवान पुन्हा श्रीमंदिरात परततात. त्यानंतर 27 जुलै रोजी होणाऱ्या नीलाद्री बीजे या धार्मिक विधीसह रथयात्रा उत्सवाची सांगता होते.
जगन्नाथ पुरी रथयात्रा ही श्रद्धा आणि परंपरा यांचा सुंदर संगम मानली जाते. देशभरातील आणि विदेशातील लाखो भाविक या सोहळ्यात सहभागी होत भगवान जगन्नाथांच्या (Jagannath Rath Yatra 2026) दर्शनाचा लाभ घेतात.







