Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी; १००-१५० वर्षे जुन्या झाडांवर चालवल्या कुऱ्हाडी
Top News

विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी; १००-१५० वर्षे जुन्या झाडांवर चालवल्या कुऱ्हाडी

environment destruction

environment destruction : प्रगती आणि विकास हवाच, पण त्यासाठी पर्यावरणाचा बळी (A Victim of the Environment) देणं किती योग्य आहे? भंडारा जिल्ह्यातील (Bhandara District) मुजबी ते भंडारा महामार्गाच्या रुंदीकरणाचे (Highway Widening) काम सध्या जोरात सुरू आहे. मात्र, या विकासाच्या वेगात सुमारे शंभर ते दीडशे वर्षांपासून सावली देणाऱ्या महाकाय वृक्षांचा श्वास गुदमरला आहे. शेकडो झाडे कापली (Hundreds of trees were cut down) जात असल्याने निसर्गप्रेमी आणि स्थानिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.

हेही वाचा – मुंबईत भाड्यानं घर शोधणं होईल सोपं; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय

भंडारा जिल्ह्यातील महामार्गाच्या ‘चौपदरीकरणाच्या’ नावाखाली निसर्गाचा अनमोल ठेवा उद्ध्वस्त केला जात आहे. मुजबी ते भंडारा दरम्यानच्या ५ किलोमीटर अंतरावर वर्षानुवर्षे उभी असलेली कडुनिंबाची आणि इतर औषधी झाडे आता जमिनीवर लोळताना दिसत आहेत. सुमारे १०० ते १५० वर्षांपासून प्रवाशांना सावली देणारी ही झाडे आता कायमची इतिहासजमा होत आहेत.

पोटाची खळगी भरणारे छोटे व्यावसायिकही उघड्यावर

केवळ पर्यावरणच नाही, तर या झाडांच्या सावलीत आपली पोटाची खळगी भरणारे छोटे व्यावसायिकही उघड्यावर आले आहेत. चहाच्या टपऱ्या, फळविक्रेते, आणि कारागीर यांच्या डोक्यावरचे सावलीचे छत्र हरवले आहे. रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक सुसाट होईल हे खरं, पण यामुळे निर्माण झालेला रोजगाराचा प्रश्न आणि पर्यावरणाची हानी कशी भरून निघणार, हा मोठा प्रश्न आहे.

आरटीओ ऑफिसपर्यंतची आणखी ७० झाडे कुऱ्हाडीच्या प्रतीक्षेत

आतापर्यंत ८० ते ९० झाडे कापली गेली असून, जुना नागपूर नाका ते आरटीओ ऑफिसपर्यंतची आणखी ७० झाडे कुऱ्हाडीच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये शिसम, निलगिरी, पिंपळ आणि कडुनिंबाच्या झाडांचा समावेश आहे. निसर्गप्रेमींमध्ये याबद्दल प्रचंड नाराजी असून, प्रशासनाने केवळ रस्ते न बांधता पर्यावरणाचे रक्षण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

यामुळे मोठ्या नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागू शकते

महामार्ग विस्तारामुळे प्रवास सुखकर होईल यात शंका नाही, पण ही ‘सुखमय’ वाटचाल निसर्गाचा बळी देऊन होणार असेल, तर येणाऱ्या काळात आपल्याला मोठ्या नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागू शकते. आता प्रशासन या वृक्षतोडीच्या बदल्यात किती नवीन झाडे लावते आणि त्यांचे संगोपन करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts