Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • काँग्रेस मुक्त भारत करणारी भाजपा काँग्रेस युक्त झाली? विरोधकांचा खोटक सवाल
Top News

काँग्रेस मुक्त भारत करणारी भाजपा काँग्रेस युक्त झाली? विरोधकांचा खोटक सवाल

BJP Congress Inclusive Debate

BJP Congress Inclusive Debate : सध्या कोणत्या पक्षाचे राजकारण कोणत्या दिशेला वळण घेईल हे सांगता येत नाही. काँग्रेस मुक्त भारत असा नारा देणारी भाजपा काँग्रेस युक्त कधी झाली त्यांनाच समजले नाही. भाजपची मुळ विचारधारेला बाजूला ठेवून काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षात घेतलं आहे. अंबरनाथ येथे भाजपने काँग्रेसला सोबत घेऊन एक विचित्र युती केल्याचे समोर आलं. तर दुसरीकडे अकोल्याच्या अकोटमध्येही अनेकांना धक्का बसणारी राजकीय समीकरणं जुळविण्यात आली आहे. इथे देखील भाजपने असदुद्दीन ओवेसी यांच्या MIM पक्षासोबत युती केली आहे. त्यामुळे भाजपवर सर्व स्तरातून सडकून टीका झाली.

हेही वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला मराठवाडाच्या विकासाचा रोड मॅप

अंबरनाथ नगरपालिकेत भाजप आणि काँग्रेसची युती झाल्यानं राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला. भाजप, काँग्रेसच्या युतीची बातमी देशभरात गाजली. काँग्रेसनं तातडीनं पावलं उचलत सर्वच्या सर्व १२ नगरसेवकांना निलंबित केलं. अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत काँग्रेसनं निलंबित केलेल्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत १२ नगरसेवकांचा पक्षप्रवेश संपन्न झाला. या घडामोडी शिंदेसेनेसाठी, विशेषतः शिंदे पितापुत्रांसाठी धोक्याची घंटा मानल्या जात आहेत.

काँग्रेसनं तर थेट १२ नगरसेवकांचं निलंबन केलं

अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेसेनेनं सर्वाधिक २७ जागा जिंकल्या. तर भाजपनं १४, काँग्रेसनं १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागांवर समाधान मानावं लागलं. भाजपनं काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेत सेनेला सत्तेपासून दूर ठेवलं. पण या विचित्र युतीची चर्चा सगळीकडे झाली. काँग्रेस, भाजपच्या राज्य नेतृत्त्वानं तीव्र नाराजी व्यक्त केली. काँग्रेसनं तर थेट १२ नगरसेवकांचं निलंबन केलं. भाजपलाही टिकेचा सामना करावा लागला. पण अवघ्या २४ तासांत भाजपनं डाव फिरवला.

भाजप वरिष्ठांच्या मूकसंमतीनंच हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा

काँग्रेस सोबत युती करण्याचा निर्णय अंबरनाथमधील स्थानिक नेते त्यांच्या वरिष्ठांच्या संमतीशिवाय घेतील, याची शक्यता अतिशय कमी आहे. भाजपची संघटना शिस्तबद्ध आहे. त्यामुळे वरिष्ठांना न कळवता काँग्रेस सोबत युती करण्याचा निर्णय परस्पर घेण्यात आला, असं म्हणण्यास जागा उरत नाही. वरिष्ठांच्या मूकसंमतीनंच हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. काँग्रेसनं नगरसेवकांचं निलंबन करुन २४ तासही उलटले नसताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्या बाराही नगरसेवकांना पक्षात घेतलं. हा शिंदेसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts