Kohli record century ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील वनडे मालिकेतील पहिला सामना रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीनं शतक ठोकून इतिहास रचला. तो आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच स्वरुपात सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज बनला आहे. या बाबतीत त्यानं सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. या सामन्यात विराट कोहलीनं शानदार फलंदाजी केली आणि 102 चेंडूत शतक पूर्ण केलं.
विराटनं वनडे स्वरुपात ठोकलं 52वं शतक :
विराट कोहलीबद्दल बोलायचं झालं तर, हे त्याचं वनडे क्रिकेटमधील 52वं शतक आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या नावावर एकाच स्वरुपात सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम होता. सचिन तेंडुलकरनं त्याच्या कारकिर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतकं ठोकली होती. मात्र, या सामन्यात शतक ठोकून विराट कोहलीनं सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. या सामन्यात विराट 120 चेंडूत 135 धावा करुन बाद झाला. त्यानं 11 चौकार आणि 7 षटकार मारले.
𝗛𝗨𝗡𝗗𝗥𝗘𝗗! 💯
Ranchi Rises to a King Kohli special! 👑
8⃣3⃣rd international CENTURY for Virat Kohli 🫡
Updates ▶️ https://t.co/MdXtGgRkPo#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank | @imVkohli pic.twitter.com/HeAExB9NPr
— BCCI (@BCCI) November 30, 2025
विराट कोहलीनं केला आणखी एक विक्रम :
कोहली वनडे सामन्यात घरच्या मैदानावर सर्वाधिक अर्धशतकं ठोकणारा पहिला फलंदाज बनला आहे. या यादीत कोहलीनं भारतात या फॉरमॅटमध्ये 59 व्यांदा अर्धशतकांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत, यासह त्यानं सचिन तेंडुलकरला मागे टाकलं. सचिननं घरच्या मैदानावर वनडे सामन्यात 58 वेळा अर्धशतकांपेक्षा जास्त धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसनं घरच्या मैदानावर वनडे सामन्यात 46 वेळा अर्धशतकांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर रिकी पॉन्टिंगनं ऑस्ट्रेलियात वनडे सामन्यात 45 वेळा अर्धशतकांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
हे ही वाचा : कसोटी मालिकेनंतर आजपासून वनडे मालिकेचा संग्राम; रोहित-विराट उतरणार मैदानात
रोहित आणि कोहली यांच्यात 136 धावांची भागीदारी :
सामन्यात, यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी भारताकडून डावाची सुरुवात केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 25 धावा जोडल्या. जैस्वाल 16 चेंडूत 18 धावा करुन बाद झाला त्यानं दोन चौकार मारले. त्यानंतर विराट कोहली रोहितला साथ देण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या सामन्यात दोन्ही फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. रोहित आणि विराटनं या सामन्यात 136 धावांची भागीदारी केली. रोहित 51 चेंडूत 57 धावा करुन बाद झाला.












