Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • कोलकात्त्याने जिंकली नाणेफेक; पंजाबची प्रथम फलंदाजी, कोणत्या संघात काय बदल..
Top News

कोलकात्त्याने जिंकली नाणेफेक; पंजाबची प्रथम फलंदाजी, कोणत्या संघात काय बदल..

Kolkata won toss Punjab batting firs

Kolkata won toss Punjab batting first : इंडियन प्रीमियर लीग 2026 (IPL 2026) च्या 12 व्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) हे दोन संघ आमनेसामने उभे ठाकले आहेत. या महत्त्वाच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

केकेआरने दोन खेळाडूंना संघातून वगळले

केकेआरने या सामन्यासाठी संघात दोन बदल केले आहेत. नाणेफेकीच्या वेळी रहाणेने जाहीर केले की, मागील सामन्यात झेल घेताना वरुण चक्रवर्ती जखमी झाला असून त्यामुळे तो उपलब्ध नाही. सुनील नरेनलाही 11 खेळाडूंमधून वगळण्यात आले आहे. वरुण आणि नरेन यांच्या जागी रोव्हमन पॉवेल आणि सैनी यांना संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे, पंजाबने आपल्या कोणताही बदल केलेला नाही.

केकेआर आणि पंजाब यांच्यात कोणाचं पारडं जड?

आयपीएल इतिहासात केकेआर आणि पंजाब यांच्यात एकूण 35 सामने झाले आहेत. त्यापैकी केकेआरने 21 वेळा विजय मिळवला आहे, तर पंजाबला फक्त 13 वेळा यश मिळाले आहे. एक सामना निकालाशिवाय राहिला आहे. त्यामुळे आकडेवारीत कोलकात्याचा स्पष्ट वरचष्मा दिसून येतो.

पंजाब किंग्सचा आत्मविश्वास उंचावला

सध्याच्या फॉर्मनुसार पंजाब किंग्सचा आत्मविश्वास उंचावलेला आहे, तर केकेआरवर विजयाचे दडपण आहे. मात्र, घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा केकेआरला मिळू शकतो. त्यामुळे हा सामना शेवटपर्यंत रंगतदार होणार यात शंका नाही.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts