Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • मध्यपूर्व तणावात भारताला मोठा दिलासा; LPG ने भरलेला ‘जग वसंत’ टँकर वडीनार बंदरात दाखल
Top News

मध्यपूर्व तणावात भारताला मोठा दिलासा; LPG ने भरलेला ‘जग वसंत’ टँकर वडीनार बंदरात दाखल

Vadinar Port | सध्या अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये जोरदार युद्ध (War) सुरू आहे. या युद्धामुळे अनेक देशांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये या युद्धाचा परिणाम भारतावरही (India) झाल्याचं दिसून येत आहे. आक्रमक इराणने होर्मुझ सामुद्रधुनीचा (Hormuz Strait) मार्ग बंद केल्यामुळे गॅस, तेलाचे टँकर असलेले अनेक जहाज अडकून पडले आहेत. त्यामुळे बाकी देशांसोबत भारतात गॅस आणि तेलाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवताना दिसत आहे. अशातच आता भारताला मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

हेही वाचा – औषधांचं अतिसेवन, अर्धांगवायूचा झटका तरीही वासना सुटली नाही; खरातबाबत धक्कादायक खुलासा

‘जग वसंत’ जहाज वडीनार बंदरामध्ये दाखल

वडीनार बंदरातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ‘जग वसंत’ नावाचे एलपीजी गॅसने भरलेले एक जहाज वडीनार बंदरामध्ये दाखल झाले आहे. या जहाजामध्ये अंदाजे 16,000 मेट्रिक टन एलपीजी गॅस असून देशांतर्गत गॅस पुरवठा करण्यासाठी हा साठा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे मध्य पूर्वेतील युद्धाच्या तणावादरम्यान भारतासाठी ही दिलासादायक बातमी आहे.

भारतातील एलपीजी गॅसची समस्या संपणार?

‘जग वसंत’ हे जहाज वडीनार बंदरात आल्यानंतर बंदर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून तेथील कामकाज अधिक कडक करण्यात आले आहे. तर आता जग वसंत हे जहाज मोठे असून या जहाजातून ‘रोझ’ नावाच्या लहान टगमध्ये एलपीजी हस्तांतरित केला जाणार आहे. तर जग वसंत भारतात सुरक्षितरित्या दाखल झाल्यामुळे देशातील गॅस पुरवठा आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे.

इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून अनेक देशांच्या जहाजांच्या वाहतुकीवर बंदी घातली होती. तर आता इराणने आपल्या पाच मित्र देशांची यादी जाहीर करत या देशांच्या जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर जाण्याची परवानगी दिली आहे. या यादीमध्ये भारत, रशिया, चीन, इराक आणि पाकिस्तान या देशांची नावे आहेत. विशेष म्हणजे इराणने जाहीर केलेल्या या यादीत भारताचे नाव अग्रस्थानी होते. तर आता इराणने या सर्व देशांच्या जहाजांना व्यापारी वाहतुकीसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता भारताला मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जागतिक कच्च्या तेलाचा आणि वायूचा सुमारे 20 टक्के पुरवठा केला जातो, जो 20 ते 25 दशलक्ष बॅरल इतका असतो. तर भारतासाठी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. कारण भारत आपल्या एकूण तेलाच्या वाहतूकींपैकी सुमारे 12 ते 15 टक्के वाहतूक या सामुद्रधुनीतून करतो.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts