Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ‘ऑपरेशन सिंदूर’ प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचं प्रतीक; वर्षातील शेवटच्या ‘मन की बात’मध्ये काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
Top News

‘ऑपरेशन सिंदूर’ प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचं प्रतीक; वर्षातील शेवटच्या ‘मन की बात’मध्ये काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

Mann ki Baat PM Modi

Mann ki Baat PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा 129 वा भाग आज प्रसारित झाला. हा वर्षातील शेवटचा भाग होता. पंतप्रधान मोदींनी 2025 मधील देशाच्या कामगिरीवर चर्चा केली आणि 2026 च्या नवीन वर्षातील आव्हानं, शक्यता आणि विकासावरही चर्चा केली.

भारतानं सर्वत्र मजबूत छाप सोडली :

आपल्या भाषणाची सुरुवात करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की 2026 हे वर्ष काही दिवसांत जवळ येत असताना, संपूर्ण वर्षाच्या आठवणी त्यांच्या मनात घुमत आहेत. अनेक कामगिरीनं देशाला एकत्र केलं आहे. 2025 नं आपल्याला असे अनेक क्षण दिले ज्यामुळं प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला. राष्ट्रीय सुरक्षेपासून ते क्रीडा क्षेत्रापर्यंत, विज्ञान प्रयोगशाळांपासून ते जगातील प्रमुख व्यासपीठांपर्यंत, भारतानं सर्वत्र एक मजबूत छाप सोडली आहे.

सुरक्षेशी तडजोड नाही :

ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, “या वर्षी ‘ऑपरेशन सिंदूर’ प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचं प्रतीक बनलं. संपूर्ण जगानं पाहिलं की आजचा भारत आपल्या सुरक्षेशी तडजोड करत नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान, जगाच्या कानाकोपऱ्यातून भारतमातेबद्दल प्रेम आणि भक्तीच्या प्रतिमा उमटल्या. ‘वंदे मातरम’ नं 150 वा वर्धापन दिन साजरा केला तेव्हाही हीच भावना दिसून आली.”

खेळातील कामगिरीचा उल्लेख :

खेळांचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, “पुरुषांच्या क्रिकेट संघानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, तर महिला क्रिकेट संघानं पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला. भारताच्या मुलींनी महिला अंध विश्वचषक जिंकून इतिहास रचला. आशिया कप टी-20 मध्येही तिरंगा अभिमानानं फडकला.”

विज्ञान आणि अंतराळात काय कामगिरी होती? :

विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात देशाच्या कामगिरीचा उल्लेख करत पंतप्रधानांनी म्हटलं की, “विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातही भारतानं मोठी झेप घेतली आहे. शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय बनले. पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीव संवर्धनाशी संबंधित अनेक उपक्रम 2025 मध्ये सुरू झाले. भारतात चित्त्यांची संख्या आता 30 पेक्षा जास्त झाली आहे.”

कुंभमेळ्याच्या आयोजनानं संपूर्ण जग आश्चर्यचकित :

या वर्षीच्या सुरुवातीला झालेल्या भव्य कुंभमेळ्याचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, या घटनेनं संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले. ते म्हणाले, “2025 मध्ये श्रद्धा, संस्कृती आणि भारताचा अद्वितीय वारसा हे सर्व एकत्र आले. वर्षाच्या सुरुवातीला प्रयागराज महाकुंभमेळ्यानं संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केलं. वर्षाच्या शेवटी अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या ध्वजारोहण समारंभाने प्रत्येक भारतीयाला अभिमानानं भरुन टाकलं.”

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts