CCTV Racket : गाझियाबादमध्ये (gaziyabad)पाकिस्तानशी (pakistan) संबंधित एक मोठे रॅकेट समोर आले आहे. देशातील अनेक संवेदनशील ठिकाणांवर CCTV लावले जात आहेत. या CCTV कॅमेऱ्यांचे ‘लाईव्ह फुटेज’ थेट सरहद्दीपार पाकिस्तानात पाठवले जात होते. यामुळे संपूर्ण देशातील CCTV नेटवर्कच्या सुरक्षेवर गंभीर प्रशचिन्ह निर्माण झाले आहे.
हे ही वाचा: पश्चिम आशियातील युद्धाचा इम्पॅक्ट औषधांवरही…!
केंद्र सरकारने उचलली तत्काळ पावले
दरम्यान, हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर केंद्र सरकारने तत्काळ पावले उचलली आहेत. गृह मंत्रालयाने इंटेलिजन्स ब्युरो (IB) आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने देशभरातील CCTV नेटवर्कचे ऑडिट (सुरक्षा तपासणी) केली जाणार आहे. सरकारी कार्यालये, विमानतळ आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांवरील कॅमेऱ्यांची सुरक्षा प्राधान्याने तपासण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनच्या कॅमेऱ्यांमधून डेटा चोरी होण्याचा मोठा धोका
भारतात ८० टक्के CCTV कॅमेरे वापरले जातात. हे सर्व CCTV कॅमेरे चीनमध्ये बनलेले आहेत. या कॅमेऱ्यांमधून डेटा चोरी होण्याचा मोठा धोका आहे. त्याचबरोबर परकीय देशांतील सर्व्हर डाउन होण्याचा धोकाही मोठा आहे. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. गाझियाबादमधील घटनेने या भीतीला दुजोरा दिला असून, स्वस्त चिनी तंत्रज्ञान देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी किती घातक ठरू शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
१ एप्रिलपासून फक्त ‘हॅकिंगप्रूफ’ कॅमेऱ्यांचीच विक्री
सुरक्षेतील या त्रुटी दूर करण्यासाठी सरकारने कडक नियमावली जाहीर केली आहे. १ एप्रिलपासून बाजारपेठेत फक्त अशाच CCTV कॅमेऱ्यांची विक्री करता येईल जे हॅकिंगप्रूफ (Hacking Proof) असतील. ज्यांना सरकारी सुरक्षा तपासणीचे (STQC Certification) प्रमाणपत्र मिळाले असेल. सध्याच्या घडीला केवळ ७ कंपन्यांचे ५३ मॉडेल्स असे आहेत, ज्यांना सरकारने सुरक्षित मानले असून त्यांना आवश्यक प्रमाणपत्रे मिळाली आहेत.






