Omraje Nimbalkar: पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील न्यायालयीन निकालानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राजकीय चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी सध्या कोणताही पक्षांतराचा निर्णय घेतलेला नसल्याचे सांगितले.
निकालानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की,” शिंदे सेनेत जाण्याचा माझा अद्याप कोणताही निर्णय नाही. मी सध्या कोणत्याही राजकीय हालचालींचा भाग नाही.”
निकालावर काहीही अवलंबून नव्हते
या प्रकरणातील न्यायालयाच्या निर्णयाचा आपल्या राजकीय भूमिकेशी कोणताही संबंध नाही, असेही त्यांनी सांगितले. “निकालावर काहीही अवलंबून नाही,” असे ते म्हणाले.
हेही वाचा: ‘वाद नको, पण उकरला तर गप्प बसणार नाही’; राज ठाकरे यांचा स्पष्ट इशारा
ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया नेमकी काय प्रतिक्रिया आहे?
निकालानंतर भावना व्यक्त करताना त्यांनी संक्षिप्त प्रतिक्रिया देत “कलयुग आहे,” असे म्हटले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. (Latest Political News)
पुढील निर्णय मतदारसंघात चर्चा करून
आपल्या पुढील राजकीय भूमिकेबाबत ते म्हणाले की, मतदारसंघात जाऊन लोकांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार आहे. “मी मतदारसंघात जाऊन चर्चा करेन आणि त्यानंतर काय करायचे ते ठरवेन,” असे त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय पुढील पावलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Political News)
धाराशिव बंदची हाक
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकारांत न्यायालयाने सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या निर्णयामुळे स्थनिक राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असून विविध ठिकाणी असंतोष व्यक्त केला जात आहे.
निकालानंतर धाराशिव शहरात व्यापारी वर्गाने मोठा निर्णय घेत आपली दुकाने बंद ठेवली. अनेक भागांमध्ये स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात आला असून शहरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. या निकालाच्या निषेधार्थ काही सामाजिक संघटनांनीही भूमिका घेत “धाराशिव बंद”ची हाक दिली आहे. (LS Marathi News Channel)
या प्रकरणात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या खटल्याचा निकाल अपेक्षेप्रमाणे नसल्याची भावना काही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
दरम्यान, प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी बंदोबस्त वाढवला असून नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.







