Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ‘भारतीय सैन्य भविष्यातील युद्धांसाठी सज्ज’; जयपूरमध्ये लष्करप्रमुखांचं मोठं विधान
ताज्या बातम्या

‘भारतीय सैन्य भविष्यातील युद्धांसाठी सज्ज’; जयपूरमध्ये लष्करप्रमुखांचं मोठं विधान

Indian Army

Indian Army : लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी गुरुवारी जयपूरमध्ये सांगितलं की, भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार असलेलं सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणांची गरज यावर भर दिला आणि ती एक धोरणात्मक गरज असल्याचं म्हटलं. आर्मी डे परेडनंतर जयपूरमध्ये बोलताना जनरल द्विवेदी म्हणाले, “भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार असलेलं सैन्य म्हणून प्रगती करत आहे. आमच्याकडे उत्तम प्रशिक्षित सैनिक, आधुनिक उपकरणं आणि अनेक क्षेत्रांमध्ये काम करण्याची क्षमता आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन आम्ही आमच्या सैनिकांना अधिक सक्षम बनवत आहोत.”

भारतीय सैन्याच्या विचारसरणीत मोठा बदल :

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, गेल्या काही वर्षांत भारतीय सैन्याच्या विचारसरणीत मोठा बदल झाला आहे. ते म्हणाले, “आम्ही केवळ सध्याच्या आव्हानांना तोंड देण्यावर लक्ष केंद्रित करत नाही तर भविष्यातील युद्धांची तयारी देखील करत आहोत. यासाठी, आम्ही भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सुसज्ज असलेल्या नवीन रचना तयार करत आहोत.” लष्करप्रमुखांनी यावेळी भैरव बटालियन आणि शक्ती बाण रेजिमेंट सारख्या नवीन युनिट्सचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “यावरुन असं दिसून येते की आपण भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज असलेली चपळ, जलद प्रतिक्रिया देणारी आणि ध्येय-केंद्रित सेना तयार करत आहोत.”

येत्या काळात अशा तयारींमध्ये वाढ होईल :

परेडबद्दल बोलताना ते म्हणाले की आजच्या परेडमध्ये परंपरा आणि बदलाचं सुंदर मिश्रण दिसून आलं. ते म्हणाले, “नेपाळ आर्मी बँडनं आमचे मजबूत संबंध दाखवले, तर नवीन युनिट्सनं सैन्याची वाढती ताकद दाखवली.” सैन्याच्या तयारीवर विश्वास व्यक्त करताना जनरल द्विवेदी म्हणाले की भारतीय सैन्य नेहमीच कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यासाठी पूर्णपणे तयार आहे. ते म्हणाले, “आम्ही भविष्यातील युद्धांसाठी देखील तयार आहोत. आम्ही परेडमध्ये हे दाखवून दिलं आहे. येणाऱ्या काळात अशी तयारी वाढेल.” ते पुढे म्हणाले की भारतीय सैन्य काळानुसार परिस्थितीशी जुळवून घेत राहील आणि आवश्यक बदल करत राहील.

राजस्थानमध्ये अनेक शूर सैनिकांनी इतिहास रचला :

परेडमध्ये “मेक इन इंडिया” उपकरणांच्या प्रदर्शनाचा संदर्भ देताना ते म्हणाले की या परिवर्तनाचा पाया स्वावलंबनावर आहे. ते म्हणाले, “भविष्यात, भारतीय सैन्याला भारतात डिझाइन आणि विकसित केलेल्या उपकरणांची आवश्यकता असेल. स्वदेशी उत्पादन आता केवळ एक ध्येय राहिलेलं नाही, तर एक धोरणात्मक गरज बनली आहे.” ते म्हणाले की, सैन्य अशा संसाधनांवर विशेष भर देत आहे जे सैन्य आणि नागरिक दोघांसाठीही उपयुक्त आहेत आणि देशाच्या सर्वांगीण विकासात योगदान देतात. जयपूरमध्ये परेड आयोजित करण्याबद्दल विचारले असता, ते म्हणाले की राजस्थान ही अशी भूमी आहे जिथं अनेक शूर सैनिकांनी इतिहास रचला आहे, म्हणूनच आर्मी डे परेडसाठी हा पर्याय निवडला गेला आहे.

 

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts