Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • यंदा नवरात्र उत्सवात देखील राबविण्यात येणार ‘वन मंडल – वन कॉप योजना’, राज्यभर होणार अंमलबजावणी
Top News

यंदा नवरात्र उत्सवात देखील राबविण्यात येणार ‘वन मंडल – वन कॉप योजना’, राज्यभर होणार अंमलबजावणी

महाराष्ट्रात सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वन मंडलवन कॉ योजना राबविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राज्यभर ही योजना राबविण्यात येणार आहे.

आता काही दिवसांनी नवरात्र उत्सव सुरु होणार आहे. त्यानुसार वन मंडल वन कॉप ही योजना राज्य सरकारने सर्व सण- उत्सवांच्या काळात लागू करण्याचा निर्णय राज्यभर घेतला आहे. ही योजना यापूर्वी फक्त आणि फक्त काही शहरांमध्ये किंवा विशिष्ट सणांच्या काळात राबवण्यात येत होता, परंतु आता संपूर्ण राज्यभर नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी लागू करण्यात आला आहे.

सणासुदीच्या काळात बऱ्याचदा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढल्याचे प्रमाण जास्त असते. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने “वन मंडल – वन कॉप” या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या उपक्रमाचा उद्देश सणांच्या काळात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे.

काय आहे ही योजना

गणेशोत्सव आणि नवरात्र या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कॉलनी नुसार मंडळे स्थापन करण्यात येतात. त्यानुषंगाने “वन मंडल – वन कॉप” योजना सुरु होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक मोठ्या मंडळासाठी एक पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात येतो.

पोलिसांची जबाबदारी काय

वन मंडल – वन कॉप या योजनेच्या माध्यमातून पोलीस कर्मचारी हे मंडळाच्या परवान्यांची पडताळणी करणे, प्रोसेशन मार्गांची तपासणी करणे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे निरीक्षण करणे, आवाज प्रदूषणाच्या नियमांचे पालन करणे, उत्तेजक घोषणा किंवा गाणी वाजवण्यापासून प्रतिबंध करणे यासारखे कार्य करतात. या पोलीस कर्मचाऱ्यांना दररोज त्यांच्या नियुक्त मंडळांना भेट देणे, उद्भवणाऱ्या समस्या त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवणे , सणानंतर अहवाल सादर करणे गरजेचे असते. या वन मंडल – वन कॉप योजनेमुळे सणांच्या काळात अनुशासन राखणे, सुरक्षा सुनिश्चित करणे आणि पोलिसांवरील विश्वास वाढवणे शक्य होईल.

वन मंडल – वन कॉप ही योजना फक्त तात्पुरत्या स्वरूपात नसून भविष्यातील वेगवेगळ्या सण उत्सवासाठी राबविण्यात येणार आहे. या सणांमध्ये नवरात्र, दहीहंडी, मुहर्रम, ईद-ए-मिलाद, शिवजयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यांचा समावेश होतो. या उपक्रमामुळे सणांच्या काळात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे शक्य होईल.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts