Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • अनिल देशमुखांवरील कथित हल्ला खोटा ठरला? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
महाराष्ट्र

अनिल देशमुखांवरील कथित हल्ला खोटा ठरला? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वळण आणणारी माहिती समोर आली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झाल्याचा दावा केलेला हल्ला पोलिसांच्या तपासात खोटा ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांनी याबाबतचा ‘बी फायनल’ अहवाल थेट न्यायालयात सादर केला आहे. या तपासात फॉरेन्सिक आणि तांत्रिक परीक्षण करण्यात आलं, पण घटनेत कुठलाही पुरावा आढळला नाही. त्यामुळे ही घटना फर्जी असल्याचं स्पष्ट झालं आहे.

नेमका हल्ल्याचा दावा काय होता?

19 नोव्हेंबर 2024 रोजी नरखेडवरून काटोलकडे परतताना बैलफाटा येथे अंधारात दबा धरून बसलेल्या काही व्यक्तींनी देशमुखांच्या गाडीवर दगडफेक केली, असा आरोप करण्यात आला होता. या घटनेत देशमुखांच्या डोक्याला मार लागून ते जखमी झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतरचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते. घटनेनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठं आंदोलन केलं होतं. त्यामुळे ही बाब त्या काळात मोठ्या राजकीय वादळाला कारणीभूत ठरली होती.

तपासातून धक्कादायक निष्कर्ष

नागपूर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून फॉरेन्सिक अहवाल न्यायालयात सादर केला आहे. त्यामध्ये एफआयआरमध्ये नमूद केलेला घटनाक्रम प्रत्यक्षात घडलेलाच नसल्याचा निष्कर्ष काढला आहे. पोलिसांच्या अहवालानुसार, पुरावे अपुरेच नव्हे तर तपासातून कोणताही तथ्यात्मक आधार मिळालेला नाही. त्यामुळे या हल्ल्याची घटना खरी होती की फक्त राजकीय सहानुभूती मिळवण्यासाठी रंगवण्यात आली होती, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुढील पावले आणि राजकीय परिणाम

या प्रकरणी पोलिसांनी ‘बी फायनल’ रिपोर्ट दिल्यानंतर आता न्यायालयाचा पुढील निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. दुसरीकडे, या घडामोडीनंतर अनिल देशमुख काय भूमिका घेतात, याकडे राज्याचे राजकीय वर्तुळ बारकाईने लक्ष ठेवून आहे. निवडणूक प्रचाराच्या निर्णायक टप्प्यात घडलेला हा कथित हल्ला खोटा ठरल्याने विरोधक हल्लाबोल करण्याची शक्यता आहे, तर समर्थक गट बचावात्मक भूमिकेत दिसू शकतो.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts