Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • खराब हवामानामुळं बंगालमधील ताहेरपूरमध्ये पंतप्रधान मोदींचं हेलिकॉप्टर उतरु शकलं नाही; व्हर्च्युअल पद्धतीनं रॅलीला संबोधित करत मागितली माफी
राजकारण

खराब हवामानामुळं बंगालमधील ताहेरपूरमध्ये पंतप्रधान मोदींचं हेलिकॉप्टर उतरु शकलं नाही; व्हर्च्युअल पद्धतीनं रॅलीला संबोधित करत मागितली माफी

कोलकाता : खराब हवामानामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नादिया इथं आगमन उशिरा झालं. दाट धुक्यामुळं हेलिकॉप्टर उतरु शकलं नाही. पंतप्रधान मोदी विमानतळावरुन व्हर्च्युअल पद्धतीनं बैठकीत सहभागी झाले. दोन वेळा प्रयत्न करूनही दाट धुक्यामुळं हेलिकॉप्टर उतरू शकलं नाही.

पंतप्रधान मोदींनी मागितली माफी :

रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “बंगालमधील नादिया येथील कार्यक्रमस्थळी खराब हवामानामुळं पोहोचता आलं नाही याबद्दल मी माफी मागतो.” ताहिरपूर येथे फोनवरून बोलताना पंतप्रधान मोदींनी हे विधान केलं. पंतप्रधान मोदींनी व्हर्च्युअल पद्धतीनं संबोधित करताना म्हटलं, “मागासलेपणाशी झुंजणाऱ्या बंगालच्या दुर्गम भागांना आधुनिक कनेक्टिव्हिटी मिळावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत. तृणमूल काँग्रेस मला आणि भाजपला कितीही विरोध करू शकते, परंतु बंगालची प्रगती थांबवू नये.”

बंगालमध्ये घुसखोरांना तृणमूल काँग्रेसचा पाठिंबा :

पंतप्रधान मोदी म्हणाले की बिहार निवडणुकीच्या निकालांनी बंगालमध्ये भाजपच्या विजयाचे दरवाजे उघडले आहेत. बंगालमधील घुसखोरांना तृणमूल काँग्रेसकडून संरक्षण मिळते असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. घुसखोरांची ओळख पटू नये म्हणून तृणमूल काँग्रेस एसआयआरला विरोध करत असल्याचा दावा त्यांनी केला.

अधिकाऱ्यांनी घेतली विशेष बैठक :

पंतप्रधान मोदी नादियाला कसे पोहोचू शकतात यावर चर्चा करण्यासाठी कोलकाता विमानतळावरील अधिकाऱ्यांनी एक विशेष बैठक घेतली. हेलिकॉप्टर उतरवण्याचेही प्रयत्न करण्यात आले. पंतप्रधान मोदी आज सकाळी दिल्लीहून कोलकात्याला गेले. कोलकातामध्ये पोहोचल्यानंतर त्यांना नादियाला पोहोचण्यासाठी तासन्तास वाट पाहावी लागली.

3200 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी :

पंतप्रधान मोदी नादियाला 3200 कोटी रुपयांच्या दोन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यासाठी येणार होते. या प्रकल्पांचं उद्दिष्ट राज्यातील रस्ते संपर्क सुधारणं आणि आर्थिक विकासाला चालना देणं आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts