Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • बिहार विधानसभा निवडणूक निकाल: पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी 6 वाजता भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करणार
Top News

बिहार विधानसभा निवडणूक निकाल: पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी 6 वाजता भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करणार

Bihar Election Results PM Modi Address: 2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळजवळ स्पष्ट होत आहेत. मतमोजणी सुरु आहे, परंतु ट्रेंड्सनुसार जेडीयू, भाजपा आणि इतर पक्षांच्या एनडीए युतीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता दर्शवित आहेत. राज्यातील 243 विधानसभा जागांसाठी मतदान 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी झालं. आता, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता भाजपा मुख्यालयात जाऊन पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करतील अशी बातमी समोर आली आहे.

भाजपा-जेडीयू कार्यालयांमध्ये जल्लोष :

बिहार विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंड्समध्ये भारतीय जनता पक्ष (भाजपा) आणि जनता दल (संयुक्त) युतीनं निर्णायक आघाडी घेतल्यानंतर, दोन्ही पक्ष कार्यालयांमध्ये जल्लोष सुरु आहे. भाजपा आणि जेडी(यू) कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या तालावर नाचून, मिठाई वाटून आणि फटाके फोडून विजय साजरा केला.

ट्रेंड्समधील निकाल :

ट्रेंड्सनुसार, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मोठ्या विजयाकडं वाटचाल करत असल्याचं दिसून येत आहे. राज्यातील निवडणूक चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीवरून जेडी(यू) निर्णायक आघाडी मिळवत असल्याचं दिसून येत आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत, एनडीए युती 202 जागांवर आघाडीवर आहे. महाआघाडी 35 जागांवर आघाडीवर आहे आणि इतर 6 जागांवर आहेत.

 

एनडीए नेत्यांनी काय म्हटलं? :

केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी निवडणूक निकालांच्या ट्रेंडला अपेक्षेप्रमाणे म्हटलं. ते म्हणाले, “आम्ही आधीच सांगितलं होतं की एनडीए प्रचंड बहुमतानं सरकार स्थापन करेल. नितीश कुमार आमचे मुख्यमंत्री असतील. कोणत्याही परिस्थितीत आम्ही 160 जागांपेक्षा कमी जाणार नाही.” दरम्यान, उदयोन्मुख निकालांवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले, “एका बाजूला लालू यादव, राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचं नेतृत्व आहे, जे तुरुंग-जामीन, भ्रष्टाचार आणि जंगल राजचं प्रतीक आहेत. बिहारच्या लोकांनी शांतता आणि सौहार्दासाठी मतदान केलं आहे.”

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts