Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • City name change Maharashtra 2025 : राज्यातील मोठ्या शहराचं बदललं नाव; काय आहे नवीन नाव?
महाराष्ट्र

City name change Maharashtra 2025 : राज्यातील मोठ्या शहराचं बदललं नाव; काय आहे नवीन नाव?

City name change Maharashtra : भारतातील शहरं आणि परिसरांची नावं कालांतरानं बदलली जातात, बहुतेकदा ऐतिहासिक आणि राजकीय कारणांमुळं. अलिकडेच, भारतीय सर्वेक्षण संस्थेनं राज्यातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर असे बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला. हा निर्णय भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या 13 ऑगस्ट 2025 च्या पत्राच्या आधारे घेण्यात आला.

राज्य सरकारच्या प्रस्तावाला पाठिंबा :

भारतीय सर्वेक्षण संस्थेनं जागेची तपासणी आणि पडताळणी केल्यानंतर प्रस्ताव मंजूर केला. इस्लामपूर नगरपरिषदेनं 4 जून 2025 रोजी ठराव क्रमांक 825 अंतर्गत शहराचं नाव ईश्वरपूर असं बदलण्याचा ठराव मंजूर केला. सांगलीचे वरिष्ठ पोस्ट ऑफिस अधीक्षक आणि मध्य रेल्वेचे सहाय्यक विभागीय अभियंता, मिरज यांनीही ना-हरकत प्रमाणपत्रे देऊन महाराष्ट्र सरकारच्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला.

हे हि वाचा : काँग्रेस ठाकरे बंधू यांच्यासोबत मुंबई महापालिका निवडणूक लढणार नाही; स्थानिक कार्यकर्त्यांची ठाकरे बंधूंसोबत एकत्र निवडणूक लढण्याची इच्छा नाही, काँग्रेस नेते भाई जगताप यांचे वक्तव्य

सांगली जिल्ह्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचं पाऊल :

भारतीय सर्वेक्षण संस्थेनं त्यांच्या तपासणीत असं आढळून आलं की प्रस्तावित नाव बदल स्वीकृत प्रक्रियेनुसार आहे. ‘ईश्वरपूर’ हे नाव बदलण्यासाठी योग्य नाव देवनागरी आणि रोमन दोन्ही लिपींमध्ये अंतिम करण्यात आलं आहे. भारतीय लिपीतील ध्वनी अचूकपणे दर्शवण्यासाठी हे लिप्यंतरण डायक्रिटिक्स सिस्टमनुसार केलं गेलं आहे. भारतीय सर्वेक्षण संस्थेनं असं सुचवलं आहे की नाव बदलाबाबत राजपत्र अधिसूचना जारी केल्यानंतर, त्याची एक प्रत त्यांच्या डेहराडून येथील मुख्य कार्यालय आणि पुणे येथील महाराष्ट्र आणि गोवा भू-स्थानिक संचालनालयाला पाठवावी. हे नाव बदल सांगली जिल्ह्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचं पाऊल मानलं जातं. इस्लामपूर, ज्याला आता ईश्वरपूर म्हटलं जाईल, ते सांगली जिल्ह्यातील एक प्रमुख शहर आहे.

 

सांस्कृतिक ओळखीचा आदर करण्याचा प्रयत्न :

हा बदल स्थानिक लोकांच्या भावना आणि सांस्कृतिक ओळखीचा आदर करण्याचा प्रयत्न करतो. भारतीय सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक सर्वेक्षक तुषार वैश यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला एक पत्र लिहून औपचारिकपणे राजपत्र अधिसूचना लवकरच जारी करण्याची विनंती केली आहे. विभागानं गृह मंत्रालय, भारतीय सर्वेक्षण महासंचालक कार्यालय, पश्चिम प्रदेश, जयपूर आणि पुणे संचालनालयालाही माहिती पाठवली आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts