Unseasonal Rain | महाराष्ट्रात (Maharashtra) एकिकडे उन्हाची (Summer) चाहूल लागत असतानाच मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भ (Vidarbh), मराठवाड्यात (Marathwada) पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे. तसेच या पावसाचा जोरदार फटका मराठवाड्याला बसल्याचं दिसत आहे.
हेही वाचा – ईमेल पाठवला तरीही…, अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत धक्कादायक खुलासा, नेमकं घडलं काय?
अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना जोरदार फटका
प्राथमिक अंदाजानुसार, मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे 19 हजार हेक्टरवरील रबी पिकांना फटका बसला आहे. तर विभागीय आयुक्तालयाच्या अहवालानुसार, बीड (Beed), लातूर (Latur), परभणी (Parbhani), धाराशिव (Dharashiv) या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावासामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला आहे. यामध्ये दोन जणांना वीज पडून मृत्यू झाला असून चार जनावरे दगावली आहेत. सोबतच 15 हजार 516 हेक्टरवरील पिके बाधित झाली असून यामध्ये 808 हेक्टर बागायत क्षेत्राचा समावेश आहे. तसेच बीडमध्ये 1 हजार 464 हेक्टरवरील बागायत क्षेत्रासह एकूण 3 हजार 409 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.












