Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • निर्णायक सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं जिंकला टॉस; टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मधून उपकर्णधार बाहेर
Top News

निर्णायक सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं जिंकला टॉस; टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मधून उपकर्णधार बाहेर

IND vs SA

IND vs SA : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 मधील सर्वात मोठा सुपर-8 सामना, ज्याची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत, तो सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करामनं सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल अपेक्षित असताना, कर्णधार सूर्यकुमार यादवनं नाणेफेकीच्या वेळी घोषणा केली की उपकर्णधार अक्षर पटेल या सामन्यात खेळणार नाही.

वॉशिंग्टन सुंदर प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम :

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही मोठ्या बदलांबद्दल सुरुवातीला काही चर्चा होती. मात्र, टॉसमधील कर्णधार सूर्यकुमार यादवच्या विधानावरुन हे स्पष्ट झाले की मागील सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात उपकर्णधार अक्षर पटेलची जागा घेणारा वॉशिंग्टन सुंदर देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात खेळेल.

काय म्हणाला सूर्या :

अक्षर पटेलला वगळण्याबाबत सूर्यकुमार यादव म्हणाला, “हा आमच्यासाठी खूप कठीण निर्णय आहे, पण आम्ही त्याच संघासोबत जात आहोत. हा एक रणनीतिक निर्णय आहे, त्यामुळं मागील सामन्यापेक्षा कोणतेही बदल नाहीत.” सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या सलामीवीर अभिषेक शर्मावर असतील, जो गेल्या तीन सामन्यात शून्यावर बाद झाला आहे.

सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग 11 :

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.

टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रभावी रेकॉर्ड :

आयसीसी टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड आतापर्यंत प्रभावी आहे, दोन्ही संघांमध्ये एकूण सात सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियानं यापैकी पाच सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेला फक्त दोन विजय मिळवता आले आहेत. त्यामुळं, या सामन्यात टीम इंडियाचा वरचष्मा असल्याचं मानलं जाऊ शकतं.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts