Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • LPG जहाज ‘जग विक्रम’ होर्मुझहून सुरक्षित रवाना; 15 एप्रिलला मुंबईत पोहोचण्याची शक्यता
ताज्या बातम्या

LPG जहाज ‘जग विक्रम’ होर्मुझहून सुरक्षित रवाना; 15 एप्रिलला मुंबईत पोहोचण्याची शक्यता

LPG जहाज 'जग विक्रम' होर्मुझहून सुरक्षित रवाना; 15 एप्रिलला मुंबईत पोहोचण्याची शक्यता

Jag Vikram : भारतीय ध्वज असलेलं एलपीजी जहाज ‘जग विक्रम’नं शनिवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास केला. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, या जहाजात अंदाजे 20,400 मेट्रिक टन एलपीजी आणि 24 खलाशी असून ते 15 एप्रिल 2026 रोजी मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. जहाजाच्या ट्रॅकिंग डेटानुसार, या टँकरनं शुक्रवार रात्री ते शनिवार सकाळच्या दरम्यान होर्मुझची सामुद्रधुनी (strait of hormuz) पार केली असून आता ते पूर्वेकडे जात आहे.

हेही वाचा : मध्य पूर्वेतील संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताचा गॅस आणि तेल पुरवठा कधीही कमी होणार नाही; कतारचं मोठं आश्वासन

15 भारतीय ध्वज असलेली जहाजं अजूनही होर्मुझमध्ये :

मंत्रालयानं सांगितलं की, हे जहाज मुंबईस्थित ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनीचं असून त्याची ओढण्याची क्षमता 26000 टनांपेक्षा जास्त आहे. ‘जग विक्रम’ हे एक मध्यम आकाराचं गॅस वाहक जहाज आहे. सरकारी आकडेवारीनुसार, मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून पर्शियन आखातातून बाहेर पडणारं ‘जग विक्रम’ हे नववं भारतीय जहाज आहे. अंदाजे 15 भारतीय ध्वज असलेली जहाजं अजूनही या परिसरात सुरक्षित प्रवासाची वाट पाहत आहेत. यापूर्वी, पश्चिम बाजूकडील आठ आणि पूर्व बाजूकडील दोन जहाजे सुरक्षितपणे निघून गेली होती.

भारताकडे जाणारी अनेक परदेशी ध्वज असलेली जहाजं देखील आखातात अडकली :

या जहाजांव्यतिरिक्त, भारतासाठी माल घेऊन जाणारी अनेक परदेशी ध्वज असलेली जहाजं अजूनही पर्शियन आखातात अडकली आहेत. सागरी वाहतुकीच्या आकडेवारीनुसार, 426 टँकर, 34 एलपीजी वाहक आणि 19 एलएनजी जहाजांसह शेकडो जहाजं अजूनही या प्रदेशात आहेत. एका सरकारी निवेदनात म्हटलं आहे की, भारतातील बंदरांचं कामकाज सामान्य असून कोणतीही गर्दी किंवा व्यत्यय नाही. शिवाय, नौवहन, जलमार्ग आणि जहाजबांधणी मंत्रालय, इतर संस्थांच्या सहकार्यानं (regional shipping tensions), परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि खलाशांच्या सुरक्षेची खात्री करत आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग :

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक आणि चौथा सर्वात मोठा गॅस ग्राहक आहे. हा देश आपल्या कच्च्या तेलाच्या सुमारे 88%, नैसर्गिक वायूच्या सुमारे 50% आणि एलपीजीच्या सुमारे 60% गरजा आयात करतो. यापैकी बहुतेक पुरवठा आखाती देशांकडून येतो आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जातो, जो जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग असून पश्चिम आशियाई संघर्षादरम्यान तो प्रभावित झाला आहे. अमेरिका आणि इराणनं अलीकडेच दोन आठवड्यांच्या सशर्त युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे, ज्यामध्ये सागरी मार्ग पुन्हा सुरु करण्याचा समावेश आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts