Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून BSNL 4G नेटवर्कचं उद्घाटन; 26,700 गावांना मिळणार कनेक्टिव्हिटी
Top News

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून BSNL 4G नेटवर्कचं उद्घाटन; 26,700 गावांना मिळणार कनेक्टिव्हिटी

हैदराबाद : देशाच्या दूरसंचार क्षेत्राला आणखी मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या स्वदेशी 4G नेटवर्कचं उद्घाटन केलं. या ऐतिहासिक पावलानं भारत आता डेन्मार्क, स्वीडन, दक्षिण कोरिया आणि चीनसारख्या देशांच्या यादीत सामील झाला आहे, जे स्वतःचं दूरसंचार उपकरणं तयार करतात. यामुळं 97,500 हून अधिक मोबाइल टॉवर आणि 26,700 गावांना कनेक्टिव्हिटी मिळेल, असा हा मोठा टप्पा आहे. यामुळं 20 लाख नवीन ग्राहक जोडले जाणार असून, डिजिटल इंडियाच्या विजनला गती मिळेल.

दूरसंचार क्रांतीचा एक नवीन अध्याय :

बीएसएनएलच्या रौप्य महोत्सवानिमित्तानं पंतप्रधान मोदी यांनी दिलेली ही मोठी भेट म्हणजे देशाच्या दूरसंचार क्रांतीचा एक नवीन अध्याय आहे. बीएसएनएलला स्थापन होऊन 25 वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर 97,500 हून अधिक 4G मोबाइल टॉवरांचं उद्घाटन करण्यात आलं. यापैकी 92,600 टॉवर बीएसएनएलच्या स्वतःच्या 4G तंत्रज्ञानानं सुसज्ज आहेत. या प्रकल्पाची अंदाजे 37,000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, यात पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान क्लाउड-आधारित असल्यानं भविष्यातील गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे आणि याला 5G मध्ये अपग्रेड करणे सोपे आहे, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

ग्रामीण आणि दुर्गम भागांपर्यंत पोहोचणार नेटवर्क :

या लॉंचमुळं भारत डेन्मार्क, स्वीडन, दक्षिण कोरिया आणि चीनसारख्या अशा निवडक देशांच्या यादीत सामील झाला आहे, जे स्वतःची दूरसंचार उपकरणे तयार करतात. हे नेटवर्क केवळ शहरी भागांपुरतं मर्यादित नसून, ग्रामीण आणि दुर्गम भागांपर्यंत पोहोचेल. विशेषतः 26,700 हून अधिक दूरस्थ, सीमावर्ती आणि नक्षलग्रस्त भागातील गावांना याचा फायदा होईल. यात ओडिशातील 2,472 गावांचा समावेश आहे. या कनेक्टिव्हिटीमुळे 20 लाख हून अधिक नवीन वापरकर्ते जोडले जाणार असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला डिजिटल क्रांतीचा लाभ मिळेल.

डिजिटल इंडिया अभियानात मोठं पाऊल :

पंतप्रधानांच्या डिजिटल इंडिया अभियानाच्या दृष्टीकोनातून हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. सरकारी निवेदनानुसार, या नेटवर्कमुळं ग्रामीण भागातील लोकांना सक्षम केलं जाईल आणि बीएसएनएलची 5जी नेटवर्कची वाटचालही सुलभ होईल. याशिवाय, डिजिटल भारत निधी अंतर्गत 100 टक्के 4जी सॅच्युरेटेड नेटवर्कचंही उद्घाटन करण्यात आलं. यामुळे 29,000 ते 30,000 गावांना मिशन मोडमध्ये जोडलं जाईल, ज्यामुळं ग्रामीण भागातील डिजिटल डिव्हाईड कमी होईल.

रोजगार संधी वाढणार :

बीएसएनएलच्या या यशामुळं देशाच्या दूरसंचार क्षेत्रात नवीन स्पर्धा निर्माण होईल. खासगी कंपन्यांसोबत सरकारी क्षेत्राचीही मजबुती होईल, ज्यामुळं ग्राहकांना परवडणाऱ्या दरात सेवा मिळेल. पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटनावेळी सांगितलं की, हे स्वदेशी तंत्रज्ञान देशाच्या युवा उद्योजकांना प्रेरणा देईल आणि ‘मेक इन इंडिया’ अभियानाला गती देईल. यामुळं रोजगार संधी वाढतील आणि तंत्रज्ञान निर्यातीची शक्यताही निर्माण होईल.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts