NEET Paper Leak | सध्या नीट पेपटफुटी (NEET Paper Leak) प्रकरणामुळे संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे. नीटचा पेपर लीक झाल्यामुळे केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून 3 मे 2026 रोजी झालेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अशातच आता नीट पेपरफुटी प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. प्राथमिक तपासात या प्रकरणाचा संबंध राजस्थानशी असल्याचं समोर आलं होतं मात्र आता तपास यंत्रणांना यात महाराष्ट्राचाही संबंध आढळला आहे.
हेही वाचा – NEET पेपर लीक प्रकरण तापलं; SOG तपासात धक्कादायक खुलासे, जाणून घ्या तपासात काय झालं उघड?
नीटचा पेपर महाराष्ट्रात झाला लीक, खळबळजनक माहिती समोर
समोर आलेल्या माहितीनुसार, नीट पेपरफुटी राजस्थानमध्ये नव्हे तर महाराष्ट्रात झाली होती. या प्रकरणी अनेक संशयितांची चौकशी सुरू आहे. या पेपरफुटीचा नाशिकशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. लीक झालेल्या पेपरची पहिली प्रत नाशिकमध्ये तयार करण्यात आली होती. तर नाशिकमध्ये छापण्यापूर्वीच पेपर लीक झाला होता. तसेच हस्तलिखित पेपर सर्वात आधी हरियाणातील गुरुग्राम येथे पोहोचला. फुटलेला पेपर गुरुग्राममधील एका डॉक्टरला देण्यात आला होता.
या प्रकरणात नाशिकमधील एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, राजस्थानमधून अटक करण्यात आलेल्या राकेश मांडवियाची ओळख पटल्यानंतर सीकरमधील कोचिंग इन्स्टिट्यूटच्या ऑपरेटरची चौकशी सुरू आहे.सध्या नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.
दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नीट यूजी 2026 परीक्षेसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. एजन्सीने 3 मे 2026 रोजी होणारी नीट यूजी परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.










