Indian ships attack three sailors killed : मध्य पूर्वेतील इराण-अमेरिका युद्धाच्या (Iran-US War) पार्श्वभूमीवर ओमानच्या खाडीत आणि हॉर्मुझ सामुद्रधुनीजवळील तणावाने भीषण रूप धारण केले आहे. अमेरिकेच्या नौदलाने (US Navy) इराणी तेलवाहू जहाजांवर ब्लॉकेड लागू केल्याच्या निमित्ताने केलेल्या कारवाईत तीन भारतीय खलाशींचा मृत्यू (Death of 3 Indian sailors) झाला असून, अनेक भारतीय कर्मचाऱ्यांसह तीन व्यापारी जहाजांवर लक्ष्य करण्यात झाली. या घटनांमुळे भारताने अमेरिकेविरोधात कठोर राजनैतिक भूमिका (Strict diplomatic stance) घेतली आहे.
गेल्या चार दिवसांत घडलेल्या या घटनांमध्ये प्रथम ८ जूनला पलाऊ ध्वज असलेल्या MT Marivex या टँकरवर हल्ला झाला. त्यात २४ भारतीय खलाशी होते, ज्यांना ओमानच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. दुसऱ्या घटनेत १० जूनला MT Settebello या पलाऊ ध्वजाच्या टँकरवर अमेरिकन विमानाने प्रेसिजन मिसाइल हल्ला केला. यात मुख्य अभियंता पत्नाला सुरेश, डेक कॅडेट आदित्य शर्मा आणि फिटर शिवानंद चौरसिया या तीन भारतीय खलाशींचा मृत्यू झाला, तर २१ जणांना वाचवण्यात आले. तिसऱ्या हल्ल्यात ११ जूनला गिनी-बिसाउ ध्वज असलेल्या MT Jalveer या टँकरवर हल्ला झाला, ज्यात २० भारतीय कर्मचारी होते आणि ते सर्व सुखरूप बाहेर काढण्यात आले.
हेही वाचा – परदेशातून डाळ आयात, देशातील गुंतवणूकदार अन् शेतकऱ्यांना फटका
जहाजे तेल वाहतूक करत होती आणि ब्लॉकेडचे नियम पाळले नाहीत अमेरिकेचा दावा
अमेरिकेच्या लष्कराने म्हटले की, ही जहाजे इराणी तेल वाहतूक करत होती आणि ब्लॉकेडचे नियम पाळले नाहीत. त्यामुळे इंजिन रूममध्ये हेलफायर मिसाइल्स डागण्यात आल्या. मात्र, भारताने यास ‘व्यापारी जहाजांवर घातक कारवाई’ म्हणून निषेध व्यक्त केला आहे. भारताची आक्रमक राजनैतिक प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या चार्ज डी’अफेअर्सना दोनदा बोलावून कठोर निषेध नोंदवला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी फोनवर चर्चा केली. जयशंकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “खाडीत अमेरिकन नौदलाच्या हल्ल्यात तीन भारतीय खलाशींच्या मृत्यूबाबत भारताची कठोर नाराजी मी पुन्हा व्यक्त केली. व्यापार वाहतूक करणाऱ्या जहाजांवर अशा घातक कारवाया न्याय्य ठरू शकत नाहीत.”
Spoke to US Secretary of State Marco Rubio this evening. I reiterated India’s strong protest at the attacks by the US Navy in the Gulf that killed three Indian mariners. Such lethal actions against commercial shipping are not justified.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) June 12, 2026
अशा प्राणघात हल्लांना कोणत्याही परिस्थितीत समर्थन नाहीच – भारताची भूमिका
भारताने असे ही स्पष्ट केलंय की, इराण-अमेरिका संघर्षात त्याची कोणतीही प्रत्यक्ष भूमिका नाही, तरीही भारतीय नागरिक आणि व्यापारी हितसंबंध धोक्यात आले आहेत. MEA ने मार्गदर्शन जारी करून खलाशींना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. भारत जगातील प्रमुख seafarer पुरवठादार देश आहे आणि आखाती क्षेत्रात हजारो भारतीय काम करतात. भारताने स्पष्ट केले की, नागरी जहाजांवर अशा हल्ल्यांना कोणत्याही परिस्थितीत समर्थन दिले जाऊ शकत नाही आणि क्षेत्रातील शांतता व स्थिरतेसाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.












