Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • ‘५६ गणेश नाईक एकत्र आले, तरी वाकडं करू शकणार नाहीत’; शितल म्हात्रेंचा नाईकांवर हल्लाबोल
Top News

‘५६ गणेश नाईक एकत्र आले, तरी वाकडं करू शकणार नाहीत’; शितल म्हात्रेंचा नाईकांवर हल्लाबोल

Sheetal Mhatre on Ganesh Naik

Sheetal Mhatre Attack on Ganesh Naik : राज्य सरकारमध्ये महायुती म्हणून एकत्र संसार करणाऱ्या शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये महापालिकानंतर मोठी धुसफूस पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंवर जबरी टीका केली होती. त्यावर, शिंदे सेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र, आता पुन्हा एकदा गणेश नाईक यांनी शिंदेंवर जहरी टीका केल्याने शिंदे सेनेच्या नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येतं. त्याला शिंदे सेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंनी गणेश नाईक यांच्यावर जहरी टीका केलीय. असे ५६ गणेश नाईक एकत्र आले तरी शिंदे साहेबांचे काही वाकडं करू शकणार नाहीत, अशा शब्दात म्हात्रेंनी पलटवार केला. त्यामुळे शिंदे सेना आणि भाजप यांच्या महायुतील वाद चव्हाट्यावर आलाय.

हेही वाचा – ‘….तर नामोनिशाण संपवून टाकू’ वनमंत्री गणेश नाईकांनी साधला उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंवर निशाणा

राजकारणात कोणीच कोणाला कमी नसते, एखाद्याला संपवायची भाषा केली तर बाकीचे हाताची घडी पाडून बसत नाहीत. वेळ आल्यावर आम्ही सुद्धा आमची भूमिका घेणार, अशी भूमिका शिंदे सेनेच्या नेत्यांनी घेतली होती. आज दिवंगत नेते आनंद दिघेच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यासाठी आम्ही जमलो आहोत, गट स्थापनेसाठी आम्ही उद्या कोकण भवनला जाणार आहोत, अशी माहिती शिवसेना महिला प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी दिली. तसेच, मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेवरुन जोरदार पलटवार केलाय.

भाजप नेत्यांनी नाईकांना समज द्यावी – शीतल म्हात्रे

गणेश नाईक यांना शेवटचे सांगणे आहे, ‘यापुढे जर एकनाथ शिंदेंबाबत एक शब्द जरी काढला तरी महिला आघाडी तुम्हाला धडा शिकवेल, या आधी त्यांनी अनेक विधानं केली, निवडणुकांनंतर अशी विधानं थांबणे अपेक्षित असताना नाईक बेताल वक्तव्य करत आहेत. त्यामुळे, भाजपच्या शिरस्त नेत्यांनी नाईकांना समज द्यावी,’ अशी मागणी शीतल म्हात्रे यांनी केली.

गणेश नाईकांना नवी मुंबईशिवाय कोण ओळखतं?

गणेश नाईकांना नवी मुंबईशिवाय कोण ओळखतं? स्वत्तः तीन वेळा पडलेत, मुलं पडलेत, नाईकांनी टिका करताना याचा विचार करावा, असेही त्यांनी म्हटलंय. गणेश नाईकांपासून महिला लांब का पळतात, नाईकांवर कुठले गुन्हे आहेत हे बोलायला लावू नका, असा सवालही म्हात्रेंनी उपस्थित केला. तसेच, एकनाथ शिंदेंचे नामोनिशाण मिटवणारा माई का लाल अजून पैदा झालेला नाही. असे ५६ गणेश नाईक एकत्र आले तरी शिंदे साहेबांचे काही वाकडं करू शकणार नाहीत, अशा शब्दात म्हात्रेंनी पलटवार केला.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts