Satyacha Morcha : आपल्या भाषणात शरद पवार म्हणाले की, ‘आमचे पक्ष वेगळे आहेत. विचारधारा वेगळी आहे. कधी मतभेद असतात. पण देशातील संसदीय लोकशाही टिकवायची असेल आणि मतांचा अधिकार टिकवायचा असेल तर तुम्हाला मला एक व्हावे लागेल. व्यासपीठावरील नेत्यांच्या वतीने आम्ही हा निकाल घेतला. मतचोरी थांबवू आणि लोकशाही कशी टिकेल याची खबरदारी घेऊ, असे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले.
हे ही वाचा – Satyacha Morcha : ‘त्या’ अॅनाकोंडाला आता आपल्याला कोंडावेच लागेल; उद्धव ठाकरेंनी पुन्हा अमित शहांना डिवचले..
संविधानाने दिलेला अधिकार जतन करण्याची वेळ आलीये
आज मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या आजच्या ‘सत्याचा मोर्चा’ला संबोधित शरद पवारांनी म्हणलं की, देशाची लोकशाही टिकवण्यासाठी कष्ट करायला तयार असलेले तुम्ही बंधू भगिनी. आजचा मोर्चा मला जुन्या गोष्टी आठवण करून देतो. मला आठवतंय १९७८-८९ या काळात महाविद्यालयात शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रात असाच मोर्चा निघाला होता. काळा घोडा आणि त्याचा परिसर तिथे मोर्चे एक प्रकारचा विचार समन्वय दाखवणारे मोर्चे होते. तुम्ही सर्वांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली. त्यातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती, त्याची आठवण होते. आज महत्त्वाचा विषय आपण हातात घेतला. आपण स्वत:साठी काही मागत नाही. आपण एवढंच म्हणतोय की लोकशाहीत संविधानाने आम्हाला अधिकार दिला त्याची जतन करणं याची वेळ आली आहे.
मतदार याद्या दुरुस्त झाल्याच पाहिजे; बाळासाहेब थोरात
राहुल गांधी यांनी मतचोरी होत असल्याचं दाखवून दिलं. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने थातूरमातूर उत्तर दिलं. आयोगाचं उत्तर इतिहासातील सर्वात बोगस उत्तर आहे. कोणतीही चौकशी केली नाही. खुलासा केला नाही. महाराष्ट्रातील निवडणुकाही अशाच बोगस मतदार यादीतून झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत जी मतदार यादी वापरली, ती स्थानिक स्वराज्य संस्थेला वापरू नका, असं आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलं.
सत्ताधाऱ्यांच्या मूक मोर्चात निवडणूक आयोग सामील झाला की काय असं वाटतंय
आम्ही सर्वजण होतो. लोकशाही मानणारे सर्वच आले पाहिजे, असा आमचा आग्रह होता. आम्ही गेलो. उत्तर मिळालं नाही. अनेक उदाहरणं दिले. नगर पालिकेसाठी मतदार याद्या जाहीर केल्या. विधानसभेच्या मतदार यादीत घोळ आहे. बोगस लोकांची नोंद आहे. ते तसेच ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहे. मतदार याद्या दुरुस्त झाल्याच पाहिजे, अशी आपली मागणी आहे. सत्ताधाऱ्यांनी मूक मोर्चा काढला. या मोर्चात निवडणूक आयोग सामील झाला की काय असं वाटतंय, असा उपरोधिक टोला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आयोगाला लागावला.








