Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • “गृहमंत्री आहात, गृहमंत्र्यासारखं वागा”, राऊतांच्या केंद्रीय गृहमंत्र्यांवर हल्लाबोल
Mumbai

“गृहमंत्री आहात, गृहमंत्र्यासारखं वागा”, राऊतांच्या केंद्रीय गृहमंत्र्यांवर हल्लाबोल

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज रविवार (दि. 05) रोजी शिर्डी दौऱ्यावर आहेत. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख भरत मोरे, मनसेचे तालुकाप्रमुख अनिल गायकवाड यांच्यासह एका सामाजिक कार्यकर्त्याला नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. मात्र यावरून, शिवसेना ठाकरे गटाचे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संताप व्यक्त केला.

याविषयी संजय राऊत म्हणाले की,”देशाचे निधड्या छातीचे गृहमंत्री, काश्मीरमधून 370 कलम हटवणारे, शिवसेनेशी मुंबईत दोन हात करू पाहणारे, शिवसेनेसारखा बलाढ्य पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीने फोडून दाखवणारे, सोनम वांगचूकला अटक करणारे, असे अमित शाह नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तुम्ही येण्याआधी राजकीय कार्यकर्त्यांना अटक करता. त्यांनी कुठल्याही प्रकारचे आंदोलन करू नये, काळे झेंडे दाखवू नये, म्हणून त्या भागातल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आले. आणि आता त्यांना नगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात नेऊन बसवण्यात आले आहे. मनसेचे कार्यकर्ते, मराठा समाजातलय कार्यकर्त्यांना देखील नोटीस बजविण्यात आली. काहींना अटक करण्यात आली”, असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच “तुम्हाला ही भीती कसली वाटत आहे?”, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

निषेध करावा तितका थोडा

यापुढे संजय राऊत म्हणाले की,”तुम्हाला लडाखमध्ये सोनम वांगचूकची भीती वाटते, मणिपूरमधल्या महिलांची भीती वाटते, महाराष्ट्रात शिवसैनिकांची भीती वाटते. तुम्ही देशावरती राज्य करत आहात, तुम्ही गृहमंत्री आहात मग तुम्हाला इतके भय वाटण्याचे कारण काय? शेतकरी अंगावर येतील म्हणून तुम्ही अद्याप मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची कार्यवाही करायला गेले नाहीत, ही पण तुमची भीती आहे. या भयग्रस्त राज्यकर्त्यांना देशावर राज्य करण्याचा अधिकार आहे का? जे लोकशाहीत आंदोलनाला घाबरतात, लोकशाहीने आम्हाला अधिकार दिला आहे, मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याचा, मंत्र्यांना जाब विचारण्याचा अधिकार दिलेला आहे. याआधीही अशा प्रकारची आंदोलन झालेली आहेत. मुंबईमध्ये शिवसैनिकांनी मोरारजी देसाई यांची गाडी अडवली होती. यशवंतराव चव्हाण यांच्या गाडीसमोर देखील आंदोलने झालेली आहेत. शरद पवार साहेबांच्या गाडीसमोर आंदोलने झाले आहेत. हे लोकशाहीत होत असतं. पण, हे गुजरात मॉडेल ज्या पद्धतीने राज्य करत आहेत, त्यांना लोकांची आंदोलन नको आहेत. त्यांना लोकांची भीती वाटते. याचा निषेध करावा तितका थोडा आहे”, अस म्हणत त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला.

पण गृहमंत्र्यांसारखं वागा

यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील शाब्दिक हल्ला चढवला. राऊत म्हणाले,”तुम्ही सामान्य शिवसैनिकांना अटक करत आहात. त्यांनी आंदोलन करण्याची घोषणा देखील केलेली नाही. ते आपल्या जागेवर काम करत होते आणि त्यांना पोलीस येऊन अटक करून घेऊन जातात. महाराष्ट्रात हा काय प्रकार सुरू आहे? आपण गृहमंत्री असाल, पण गृहमंत्र्यांसारखं वागा. हा पळपुटेपणा कशा करिता? देवेंद्र फडणवीस देखील तसेच वागत आहेत आणि देशाचे गृहमंत्री देखील त्याच पद्धतीने वागत आहेत. विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणे, अटक करणे, तुरुंगात टाकणे यावरच यांचे राज्य सुरू आहे. मात्र, हे फार काळ चालणार नाही”, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts