Pakistan Threaten To Attacked On Kolkata | एकिकडे अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे तिन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानच्या (Afghanistan) तालिबानांमध्येही युद्धाची ठिणगी पेटली आहे. अफगाणिस्तानच्या तालिबान्यांनी पाकिस्तानच्या नाकात दम आणलेला आहे. अशातच आता या युद्धामुळे पाकिस्तानचे डोकं फिरलं असल्याचं दिसत आहे. कारण पाकिस्तानने आता थेट भारताशी पंगा घेतला आहे.
हेही वाचा – “नरकाचे दरवाजे उघडतील…”, इराणचा गंभीर इशारा; ट्रम्प यांच्या भूमिकेला म्हटलं ‘मूर्खपणाचं पाऊल’
पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी भारताला काय दिली धमकी?
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. यावरून आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ (Khawaja Asif) यांनी भारताला पोकळ धमकी दिली आहे. आम्ही भविष्यात कोलकत्यावर हल्ला करू, अशी पोकळ धमकी ख्वाजा आसिफ यांनी भारताला दिली आहे. ख्वाजा आसिफ यांनी दिलेल्या या धमकीनंतर युद्ध पेटणार का? आणि भारत याला काय उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शनिवारी (4 एप्रिल) सियालकोटमध्ये माध्यमांशी संवाद साधताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला पोकळी धमकी दिली. जर भविष्यात संघर्ष पेटला तर भारताच्या सीमावर्ती भागावर किंवा मुंबई, दिल्लीपर्यंत पाकिस्तान मर्यादित राहणार नाही. आम्ही थेट मुंबई, दिल्लीसह कोलकत्यावरही हल्ला करू, अशी धमकी ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे.
ख्वाजा आसिफ यांनी भारताला नेमका काय दिला इशारा? युद्ध पेटणार?
भारताने कसल्याही प्रकारचे साहस करू नये. जर त्यांनी काही करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या पूर्वेतील सर्वात मोठ्या शहरावर कोलकत्तावर आम्ही मोठा हल्ला करू, असंही ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले की, पाकिस्तानला जागतिक स्तरावर बदनाम करण्याचा प्लॅन भारताचा आहे. भारत सध्या फॉल्स फ्लॅग ऑपरेशनची तयारी करत आहे. तसेच भारत त्यांच्या नागरिकांच्या माध्यमातून पाकिस्तानच्या नागरिकांना आणि पाकिस्तानला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही ख्वाजा आसिफ यांनी केला आहे.
दरम्यान, ख्वाजा आसिफ यांनी दिलेल्या या पोकळ धमकीनंतर भारत त्यांना काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच आसिफ यांच्या धमकीनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.












