Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • सर्वसामान्यांच्या खिशाला झळ! आंब्याचे दर गगनाला भिडले; पुणे आणि इतर जिल्ह्यांत काय आहेत भाव? जाणून घ्या
Top News

सर्वसामान्यांच्या खिशाला झळ! आंब्याचे दर गगनाला भिडले; पुणे आणि इतर जिल्ह्यांत काय आहेत भाव? जाणून घ्या

Mango Rate | सध्या संपूर्ण राज्यात उन्हाळ्याची (Summer) चाहूल लागली आहे. उन्हाळ्याला सुरूवात झाल्यापासून सर्वांचा आवडता आंबाही (Mango) बाजारात उपलब्ध होऊ लागला आहे. बाजारात आंबा आला असला तरी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण यंदा आंब्याचे दर (Mango Rates) गगनाला भिडले आहेत. राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षी अंब्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

हेही वाचा – भोंदूबाबा अशोक खरातच्या जीवाला धोका; SIT चा मोठा निर्णय, न्यायालयानेही दिला ग्रीन सिग्नल

आंब्याचे कोणत्या भागात किती आहेत दर?

आवक कमी असल्यामुळे यंदा हापूस आंब्याच्या (Hapus Mango) दरात मोठी वाढ झाली आहे. हापूस सोबत रत्नागिरी आणि देवगड आंब्याच्या दरांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. तर राज्यातील विविध शहरांमध्ये आंब्यांचे वेगवेगळे दर पाहायला मिळत आहेत.

पुणे शहरात आंब्याचे दर 2,300 ते 2,600 रूपये प्रति डझन एवढे आंब्याचे दर आहेत. तर मुंबईत हापूस आंबा 2,500 रूपये ते 7,000 रूपये प्रति डझन एवढा आंब्याचा दर आहे. नाशिकमध्ये 1,500 ते 1800 रूपये दर असून बारामतीमध्ये 1,700 ते 2,200 रूपये प्रति डझन दर आहे. तसेच मराठवाड्यात 1,500 ते 4,000 रूपये प्रति डझन एवढा दर आहे तर जळगावमध्ये 1,000 ते 1,100 रूपये प्रति डझन एवढा दर आहे. सोलापूरमध्ये 1,200 रूपये एवढा आंब्याचा दर आहे.

हापूसचे माहेरघर असलेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आंब्याचे दर चांगलेच वाढले आहेत. रत्नागिरीत हापूस आंबा 1,000 ते 2,000 रूपये प्रति डझन किंमतीने विकला जात आहे. तर देवगड हापूस आंबा हा 1,500 ते 3,000 रूपये प्रति डझन किंमतीने विकला जात आहे. तसेच आंब्याच्या 4 ते 6 डझनाच्या पेटीसाठी 5 ते 6 हजार रूपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत.

एकिकेड राज्यातील काही भागांमध्ये हापूस आंबा दाखल झाला आहे. तर काही भागांमध्ये अजूनही आंबा उपलब्ध झालेला नाहीये. हिंगोली, वर्धा, पंढरपूर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा या भागांमध्ये आंबा अजूनही दाखल झालेला नाहीये. तसेच सध्या ज्या भागांमध्ये आंबा उपलब्ध झाला आहे तिथे आंब्याचे दर तेजीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसताना दिसत आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts