VB-G RAM G Scheme: सरकारकडून व्हीबी-जी-आरएएम-जी योजना १ जुलैपासून जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे? चला तर जाणून घेऊयात.
सरकारकडून ग्रामीण भागातील रोजगार वाढवण्यासाठी व्हीबी-जी-आरएएम-जी योजना १ जुलैपासून जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गावातील गरजू आणि बेरोजगार मजुरांना नियमित कामाचा संधी उपलब्ध करून देणे. या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून अनेक कुटूंबाना थेट फायदा होणार आहे. आता या योजेनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार आहे, ते सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचा: पुण्यात रात्रभर रिमझिम पाऊस; घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता, पुढील ३ दिवस हवामान विभागाचा रेड अलर्ट
या योजनेत मोठा बदल केला आहे. आता लोकांना १०० दिवसांऐवजी १२५ दिवस काम मिळणार आहे. म्हणजेच २५ दिवस जास्त रोजगार मिळेल. सरकारने या योजनेसाठी खूप मोठा निधी ठेवला आहे. सुमारे ९५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त, जेणेकरून योजना व्यवस्थित चालेल.
कोणाला मिळणार फायदा?
या योजनेचा सर्वात मोठा फायदा ग्रामीण भागातील गरीब आणि कामगार वर्गाला होणार आहे. ज्यांना नियमित रोजगार मिळत नाही, अशा कुटुंबांना याचा थेट लाभ मिळेल. पात्र व्यक्तींना ग्रामपंचायतीमध्ये नोंदणी करून कामाची मागणी करता येईल.
ज्यांच्याकडे आधीपासून जॉब कार्ड आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही.
काम कसे मिळणार?
गावातील ग्रामपंचायत हीच कामांचे नियोजन करणार आहे. कोणती कामे करायची हे गावातील लोक एकत्र येऊन ठरवतील. त्यानंतर नोंदणीकृत मजुरांना काम उपलब्ध करून दिले जाईल.
जर काम मागूनही वेळेत मिळाले नाही, तर नियमानुसार बेरोजगारी भत्त्याची तरतूद असू शकते.
मजुरी किती मिळेल?
या योजनेअंतर्गत किमान मजुरी दररोज निश्चित करण्यात आली आहे. काही राज्यांमध्ये स्थानिक दरानुसार मजुरी अधिकही मिळू शकते.
नोंदणी कशी करायची?
काम मिळवण्यासाठी लोकांनी ग्रामपंचायतीत नाव नोंदवायचे आहे. ज्यांच्याकडे आधीच मनरेगा जॉब कार्ड आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करावी लागणार नाही.










