Pawanraje Nimbalkar Murder Case: २००६ मध्ये घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली होती. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण नेमकं काय होत चला तर जाणून घेऊयात
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर (Pawanraje Nimbalkar) यांच्या हत्या प्रकरणाचा जवळपास दोन दशकांनंतर निकाल लागल्याचे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. २००६ मध्ये घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली होती.
पवनराजे निंबाळकर कोण होते? (Pawanraje Nimbalkar)
पवनराजे निंबाळकर (Pawanraje Nimbalkar) हे धाराशिव जिल्ह्यातील प्रभावशाली राजकीय नेते आणि सामाजिक क्षेत्रातील परिचित व्यक्तिमत्त्व होते. स्थानिक राजकारणात त्यांचा मोठा प्रभाव मानला जात होता. त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेक राजकीय समीकरणे बदलत असल्याची चर्चा त्या काळात होती.
हत्येची घटना कशी घडली?
जून 2006 मध्ये पवनराजे निंबाळकर (Pawanraje Nimbalkar)हे मुंबईहून धाराशिवकडे परतत होते. नवी मुंबईतील कळंबोली परिसरात त्यांच्या वाहनाला अडवून हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.
तपासात काय समोर आलं?
सुरुवातीला या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडे होता. मात्र तपासाबाबत शंका उपस्थित झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले. तपासादरम्यान अनेक आरोपींची नावे समोर आली आणि कथित कट रचल्याचे आरोप करण्यात आले.
३० लाखांच्या सुपारीचा आरोप
सीबीआयच्या तपासानुसार, पवनराजे निंबाळकर (Pawanraje Nimbalkar) यांच्या हत्येसाठी सुमारे ३० लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणातील काही आरोपींवर भाडोत्री मारेकऱ्यांच्या माध्यमातून हत्या घडवून आणल्याचा आरोप होता. तपासादरम्यान पारसमल जैन हा माफीचा साक्षीदार बनला आणि त्याने अनेक महत्त्वाचे खुलासे केले.
अण्णा हजारे यांचा उल्लेख का झाला?
या खटल्यातील सुनावणीदरम्यान माफीच्या साक्षीदाराने दिलेल्या जबाबात समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबाबतही काही दावे करण्यात आले होते. त्यामुळे हे प्रकरण केवळ हत्येपुरते मर्यादित न राहता राज्यातील राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय बनले.
२० वर्षांची न्यायालयीन लढाई
या प्रकरणात १२८ हून अधिक साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. अनेक वर्षे चाललेल्या तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर अखेर या गाजलेल्या हत्या प्रकरणाचा निकाल समोर आला. या निर्णयामुळे दोन दशकांपासून सुरू असलेल्या कायदेशीर लढ्याचा महत्त्वाचा अध्याय संपुष्टात आला आहे.
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण (Pawanraje Nimbalkar Murder Case) हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या गुन्हेगारी प्रकरणांपैकी एक मानले जाते. या निकालाकडे राज्यभरातील राजकीय व सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले होते.
Website : https://lokshevay.com/






