• Home
  • राजकारण
  • मुंबईतील कोळी समाज एकवटला, फक्त कोळी उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन
Top News

मुंबईतील कोळी समाज एकवटला, फक्त कोळी उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन

Mumbai Koli Community Vote Appeal
3

Mumbai Koli Community Vote Appeal : राज्यातील २९ महापालिकांसाठी उद्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पद्धतीने मतदारांना आवाहन करण्यात येत आहे. त्यातच आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने कोळी समाजाला पक्षभेद बाजूला ठेवून केवळ कोळी उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन केलेय. त्यामुळे कोळी समाजाचे उमेदवार कोणत्या पक्षात जास्त आहेत त्या पक्षाला मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा – जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकला, ओबीसीच्या मोठ्या नेत्याची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबईतील मराठी मतदारांपैकी सुमारे एक तृतीयांश मतदार कोळी समाजाचे असल्याने ही मतदारशक्ती एकवटली, तर मुंबई महानगरपालिकेत कोळी समाजाचे प्रभावी प्रतिनिधित्व उभे राहू शकते, असं अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिताने नमूद केलं आहे.

मागील मनपा निवडणुकीत कोळी समाजाला केवळ तीन उमेदवारी मिळाल्या होत्या; यंदा मात्र १३ कोळी उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ही संधी समाजाने वाया घालवू नये असे आवाहन समितीने केले आहे.

कोळीवाड्यांसाठी अपुरी आर्थिक तरतूद, मासळी मंड्यांची दुर्दशा, बाजारांचे जबरदस्तीने स्थलांतर, जेट्टींची दुरवस्था आणि कोळी वसाहतींचे सातत्याने दुर्लक्षित करण्यात आलंय. ही कोळी समाजाच्या प्रश्नांची काही उदाहरणे असल्याचे मच्छिमार कृती समितीनं सांगितलं आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts