Riteish Deshmukh on Ambassador MSRTC: महाराष्ट्रात सध्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेता रितेश देशमुख यांनी आपलं ठाम मत मांडत मराठीला प्राधान्य देण्याचा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अलीकडेच राज्य परिवहन व्यवस्थेसाठी काही महत्वाचे निर्णय घेतले असून, त्यामध्ये रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची एसटी बसच्या ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या घोषणेनंतर रितेश यांनी आपल्या भावना व्यक्त करत बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
रितेश म्हणाले की, त्यांचे वडील, माजी मुख्यमंत्री विकासराव देशमुख यांच्यासोबत त्यांची लहानपणी अनेकदा एसटी बसने प्रवास केला आहे. त्या प्रवासाने त्यांच्या आयुष्यात खास स्थान मिळवलं असून आज त्याच एसटी सेवेशी जोडले जाणं हा अभिमनाचा क्षण असल्याचं त्यांनी सांगितलं.
मराठी सक्तीच्या मुद्द्यावर बोलताना रितेश यांनी स्पष्ट केलं की महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य असणं गरजेचं आहे. त्यांच्या मते, जसं आपण इतर राज्यांमध्ये गेल्यावर तेथील स्थानिक भाषा वापरण्याचा प्रयत्न करतो, तसंच महाराष्ट्रातही मराठीला प्राधान्य मिळायला हवं.
दरम्यान, या निर्णयाविरोधात काही रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी आंदोलन सुरू केलं असलं तरी सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. पुढील काळात या मुद्द्यावर काय निर्णय होतो आणि परिस्थिती कशी बदलते, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.











