3 Idiots sequel after 15 years : 2009 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ज्याने प्रत्येकाच्या मनात घर केले होते. तो चित्रपट आता तब्बल 15 वर्षांनी परत येतोय. त्या चित्रपटाचे नाव आहे 3 इडियट्स. होय आता या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता या 3 इडियट चित्रपटात करीना कपूर, आर माधवन शर्मन जोशी पुन्हा एकत्र दिसणार आहे. या सिक्वेल मध्ये नॉस्टॅल्जिया आणि नवी कथा या दोन्ही गोष्टी एकत्र पाहायला मिळतील.
2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार
ऑल इस वेल हा डायलॉग या 3 इडियट्स चित्रपटातून घराघरात पोहोचला होता. हा डायलॉग आज देखील चाहत्यांच्या मनात आहे. 15 वर्ष या चित्रपटाला रिलीज होऊन झाले तरीही हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. आता या चित्रपटाचा सिक्वेल 2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगल्याचे दिसत आहे.
After 15 years, 3 Idiots is finally gearing up for a sequel, reuniting its iconic cast Aamir Khan, Kareena Kapoor, R Madhavan, and Sharman Joshi under Rajkumar Hirani’s direction.#IIFA #Bollywood #3Idiots pic.twitter.com/Y4FGZN0BZx
— IIFA (@IIFA) December 8, 2025
ही स्टारकास्ट असणार
या 3 इडियट्स चित्रपटातील सिक्वेल मध्ये कोण कोण कलाकार असणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. खास करून रँचो आणि फरहानची जोडी पुन्हा नव्याने झळकणार आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात आमिर खान, करीना कपूर, आर माधवन, शर्मन जोशी पुन्हा एकत्र दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी हे करणार असून आमिर खान, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिराणी या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. याबाबत पिंक वेलाने माहिती दिली आहे.
हे ही वाचा : धुरंधर चित्रपटातील अक्षय खन्नाचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; ऑक्सिजन मास्क लावून शुटींग केले पूर्ण
कोण साकारेल रँचो आणि प्रिया ची भूमिका
ऑनस्क्रीन जोडी म्हणून आमिर खान आणि करीनाची जोडी प्रेक्षकांना भावली आहे. 3 इडियट्स मध्ये देखील आमिर खान आणि करीना यांची जोडी झळकली होती. जी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. आता या जोडीची केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. आता आमिर खान आणि करीन यांची जोडी रँचो आणि प्रिया या भूमिकेत मॅच होतील का आणि ते प्रेक्षकांना कितपत भावेल हे पाहणे योग्य ठरणार आहे.
15 वर्षांपूर्वी रिलीज झालेली 3 इडियट्स या चित्रपटात शिक्षण पद्धतीवर भर देण्यात आला होता. या चित्रपटाने 200 कोटींचा आकडा गाठला होता. हा आकडा गाठणारी ही पहिली भारतीय फिल्म ठरली होती. आता या चित्रपटाच्या सिक्वेल मध्ये कहाणी काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.












