Thackeray 6 MPs Rebel : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घटताना समोर येत आहेत. मागील काही दिवसांपासूनऑपरेशन टायगर चर्चा सुरु होती. मात्र, त्याला ठाकरे गटाकडून विरोध केला जात होता. अखेर आज ऑपरेशन टायगर विषय सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे सेनेच्या खासदारांनी नुकतीच आई तुळजाभवानी, आई-बाब आणि साई-बाबा शपथ घेऊन पक्षासोबत एकनिष्ठ राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, राजकारणत शपथा, आणाभाका, नितीमत्ता, नैतिकता या गोष्टींना काहीच थारा राहिलेला नाही? हे आजच्या प्रसंगातून दिसून येत आहे.
ठाकरे गटाच्या ६ खासदारांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत होणारा संभाव्य प्रवेश हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाला एक अत्यंत मोठा आणि अनपेक्षित धक्का देणारा ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला आणि विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठं यश मिळालं असतानाच, आता थेट त्यांचे खासदार फुटणार असल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे सुरू असलेल्या वेगवान हालचाली आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. येत्या १९ जून रोजी शिवसेनेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून हा ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असणारा सोहळा पार पडणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतंय.
खासदारांमध्ये अंतर्गत पातळीवर तीव्र असंतोष
या संपूर्ण घडामोडीला राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये ‘ऑपरेशन टायगर’ असं नाव दिलं गेलंय. यामुळे शिवसेना आणि ठाकरे कुटुंब यांच्यासमोरील अडचणी पुन्हा एकदा कमालीच्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संपूर्ण राजकीय भूकंपाची पार्श्वभूमी आणि त्याचं मूळ शोधायचं झाल्यास, आपल्याला गेल्या काही महिन्यांतील पडद्यामागच्या घडामोडींचा वेध घ्यावा लागेल. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने अनपेक्षित कामगिरी करत ९ जागांवर विजय मिळवला होता. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला पुन्हा एकदा उभारी मिळाली असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र, प्रत्यक्षात निवडून आलेल्या खासदारांमध्ये अंतर्गत पातळीवर तीव्र असंतोष खदखदत होता, अशी माहिती आता समोर येत आहे.
खासदारांशी गुप्तपणे संपर्क साधण्यास सुरुवात
या खासदारांना पक्षाच्या भविष्यातील धोरणांविषयी, महाविकास आघाडीमधील जागावाटपाच्या समीकरणांविषयी आणि विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत राहिल्याने आपल्या हक्काच्या मतदारसंघावर गदा येईल, अशी भीती वाटत होती. याच भीतीचा आणि असंतोषाचा फायदा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीकारांनी या खासदारांशी गुप्तपणे संपर्क साधण्यास सुरुवात केली. अत्यंत गोपनीय पद्धतीने चाललेल्या या वाटाघाटी अनेक महिने सुरू होत्या आणि आता त्याला अंतिम स्वरूप आलंय. १९ जून हा दिवस शिवसेनेच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण याच दिवशी शिवसेना या प्रादेशिक पक्षाची स्थापना झाली होती. दरवर्षी या दिवशी शिवसेनेचा भव्य वर्धापन दिन साजरा केला जातो.
वर्धापन दिनी या ६ खासदारांचा अधिकृत पक्षप्रवेश
यंदाचा हा वर्धापन दिन मुंबईतील गोरेगाव येथील प्रसिद्ध नेस्को सेंटरच्या भव्य मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या दिवशी शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत असतानाच, ठाकरे गटाच्या या ६ खासदारांचा अधिकृत प्रवेश याच मंचावरून करून घेण्याचं नियोजन करण्यात आलंय. वर्धापन दिनाचा हा मेळावा केवळ पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी न राहता, उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर आणि अस्तित्वावर थेट प्रहार करण्यासाठी वापरला जाणार आहे. भर मेळाव्यात, हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आणि थेट प्रक्षेपण सुरू असताना हा प्रवेश घडवून आणून एकनाथ शिंदे हे स्वतःलाच खरी शिवसेना म्हणून पुन्हा एकदा सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहेत.












