Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • कोणी 27 तर कोणी 95 मतांनी जिंकलं; बिहारच्या जागा जिथं अत्यंत कमी फरकानं लागला निकाल
Top News

कोणी 27 तर कोणी 95 मतांनी जिंकलं; बिहारच्या जागा जिथं अत्यंत कमी फरकानं लागला निकाल

Bihar Election Close Margin Seats : बिहार निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहे. एनडीएनं 200 हून अधिक जागांसह ऐतिहासिक विजय मिळवला आहे, तर महाआघाडीला 50 जागाही ओलांडता आल्या नाहीत. काही उमेदवारांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे, तर काहींनी सर्वात कमी फरकानं विजय मिळवला आहे.

केवळ 27 मतांनी विजय :

बिहार निवडणुकीत सर्वात कमी फरकानं विजय मिळवणाऱ्या उमेदवारांच्या यादीत जेडीयूचे उमेदवार रामचरण शाह अव्वल आहेत. त्यांनी संदेश मतदारसंघातून फक्त 27 मतांनी विजय मिळवला, त्यांनी 80,598 मतं मिळवत आरजेडीचे दीपू सिंग यांचा पराभव केला, ज्यांना 80,571 मतं मिळाली. जनसुराज पक्षानं इथं चांगली मतं घेतली. जेएसपीच्या राजीव रंजन राज यांना 6040 मतं मिळाली. त्याचप्रमाणे, भाजपाचे उमेदवार महेश पासवान यांनी आगियां मतदारसंघातून फक्त 95 मतांनी विजय मिळवला. त्यांना 69,412 मतं मिळवली आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी-लेनिनवादी) चे उमेदवार शिवप्रकाश रंजन यांचा पराभव केला. एलजेपी (रामविलास) च्या उमेदवार संगीता देवी यांनी बलरामपूर मतदारसंघातून 389 मतांनी विजय मिळवला, त्यांनी एआयएमआयएमचे उमेदवार मोहम्मद आदिल हुसेन यांचा पराभव केला. त्यांना 80,459 मतं मिळाली.

लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे उमेदवार अरुण कुमार यांनी बख्तियारपूर मतदारसंघातून 981 मतांनी विजय मिळवला, त्यांनी 88,520 मतं मिळवली, त्यांनी आरजेडीचे उमेदवार अनिरुद्ध कुमार यांचा पराभव केला, ज्यांना 87,539 मतं मिळाली. आरजेडीचे उमेदवार कुमार सर्वजीत यांनी बोधगया मतदारसंघातून 881 मतांनी विजय मिळवला, त्यांनी 100,236 मतं मिळवली, त्यांनी एलजेपी (रामविलास) चे उमेदवार श्यामदेव पासवान यांचा पराभव केला, ज्यांना 99,355 मतं मिळाली.

हे ही वाचा – बिहारच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठा ट्विस्ट! जेडीयू करून ‘ती’ पोस्ट डिलिट, भाजप नेत्यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

काँग्रेसचे उमेदवार अभिषेक रंजन यांनी चनपटिया मतदारसंघातून 602 मतांनी विजय मिळवला, त्यांनी 87,538 मतं मिळवली, तर भाजपाचे उमेदवार उमाकांत सिंह यांचा 86,936 मतं मिळाली. आरजेडी उमेदवार फैसल रहमान यांनी ढाका मतदारसंघातून 178 मतांनी विजय मिळवला, त्यांना 1,12,727 मतं मिळाली, त्यांनी भाजपाचे पवन कुमार जयस्वाल यांचा पराभव केला, ज्यांना 1,12,549 मतं मिळाली.

काँग्रेस उमेदवार मनोज विश्वास यांनी बिहारमधील फोर्ब्सगंज मतदारसंघातून 221 मतांनी विजय मिळवला, त्यांना 1,20,114 मतं मिळाली, त्यांनी भाजपाच्या विद्या सागर केसरी यांचा पराभव केला, ज्यांना 1,19,893 मतं मिळाली. शिवाय, जहानाबाद, नबीनगर आणि रामगडमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या आहेत.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts