Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • मुंबईत महापालिकेत काँग्रेस स्वबळावर लढणार; काँग्रेस प्रभारी चेन्नीथला यांची अधिकृत घोषणा
Top News

मुंबईत महापालिकेत काँग्रेस स्वबळावर लढणार; काँग्रेस प्रभारी चेन्नीथला यांची अधिकृत घोषणा

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. मुंबई येथे आज काँग्रेसकडून एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. याच शिबिरात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी काँग्रेस मुंबई महानगरपालिकेत स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे हा महाविकास आघाडीतील इतर राजकीय पक्षांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी स्वतंत्र पालिका निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेतल्याची रमेश चेन्नीथाला यांनी सांगितले. मुंबईच्या पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी किंवा इतर कोणासोबत न जाण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

हेही वाचा – बिहारच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठं ट्विस्ट! जेडीयू करून ‘ती’ पोस्ट डिलिट, भाजप नेत्यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?

मुंबई काँग्रेसच्या वतीने ही निवडणूक स्वबळावर लढली पाहिजे, हे आम्ही मांडलं. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासोबत आमची युती कायम असणार आहे, त्यांच्याशीही आम्ही बोलणार आहोत, असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.

मनसेला महाविकास आघाडीसोबत घेण्यास काँग्रेसचा कडाडून विरोध

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र काँग्रेसने मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यास विरोध दर्शविल्याचे याआधी दिसून आले होते. त्यामुळे निवडणुकीत मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच आता आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे.

हा निवडणूक आयोगाचा विजय असून, भाजपचा नाही“; चेन्नीथला

बिहारच्या निवडणुकीवर बोलताना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले, “हा निवडणूक आयोगाचा विजय असून, भाजपचा नाही. काँग्रेसमध्ये प्रत्येक जातीचे लोक आहेत. त्यांच्या पक्षात फक्त एका जातीचे लोक आहेत, ही आमची परंपरा आहे. मोदी आणि शाह यांनी निवडणूक आयोगाचा दुरुपयोग केला असून, याबाबत लोकांमध्ये जाऊन जागृती करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका करत असतात, असेही त्यांनी सांगितलं.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts