• Home
  • ताज्या बातम्या
  • NEET आंदोलनाचा इम्पॅक्ट! राज ठाकरेंचा तरुणाईला सलाम; म्हणाले, “जेन-झीने सरकारच्या…”
राजकारण

NEET आंदोलनाचा इम्पॅक्ट! राज ठाकरेंचा तरुणाईला सलाम; म्हणाले, “जेन-झीने सरकारच्या…”

Raj Thackeray
Raj Thackeray: नुकताच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या घडामोडीनंतर अनेक ठिकाणी तरुणांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं त्यांनी काय म्हटलं, जाणून घेऊया.

NEET पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाल्याचा दावा केला जात आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतरही आंदोलनकर्त्यांचा संघर्ष संपलेला नसून, या संपूर्ण आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे सरकारला निर्णय बदलण्यास भाग पाडले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

हेही वाचा: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस दिल्लीला रवाना; अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

विविध संघटनांकडून आंदोलन सुरू

दिल्लीतील जंतरमंतर परिसरात अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि विविध संघटनांकडून आंदोलन सुरू होते. NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी आणि पारदर्शक चौकशीची मागणी यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्याने आवाज उठवला. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत गेला आणि अखेर केंद्र सरकारवर दबाव वाढल्याचे चित्र दिसले.

विद्यार्थ्यांचे राज ठाकरे कडून कौतुक

महाराष्ट्रातही या आंदोलनाच्या समर्थनार्थ विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी भूमिका घेतली आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या चिकाटीचे कौतुक करत राज ठाकरे यांनी सरकारवरही निशाणा साधला.

तरुणांनी सरकारला वास्तवाची जाणीव करून दिली

पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी दाखवलेली एकजूट ही लोकशाहीसाठी सकारात्मक बाब आहे. तरुणांनी सातत्याने संघर्ष केल्यामुळे सरकारला त्यांच्या भावना आणि मागण्यांची दखल घ्यावी लागली. हा केवळ एका निर्णयाचा विजय नसून, संघटित जनआंदोलनाची ताकद दाखवणारा क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले.

उद्याचा मोर्चा नियोजनानुसारच

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही मुंबईतील प्रस्तावित मोर्चा नियोजनानुसार काढण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. आंदोलनातील पुढील मागण्यांवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा, यासाठी हा मोर्चा महत्त्वाचा असल्याचे आयोजकांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना संयम राखत लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन केले. तसेच, शिक्षण व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने पारदर्शक आणि कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts