5 major developments in state politics : हाताशी धरून २ डिसेंबरची निवडणूक रद्द केल्याचा आरोप शिंदे गटाने भाजपावर केला. दोन दिवसांत शिंदेंच्या सेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने मातोश्रीवर पक्षप्रवेशाची लगबग दिसून आली. राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना राज ठाकरे हे अचानक दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणावरून अंबादास दानवेंनी महायुती सरकारला चार महत्वाचे प्रश्न विचारले आहेत. नगरपालिका निवडणुकांचा निकाल पुढे गेल्याने मतयंत्रांत घालमेल करण्याची संधी सरकारला मिळू शकते, अशी टीका काँग्रेसने केली. या सर्व घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊ..
१. मित्रपक्ष शिंदे गटाचा भाजपवर गंभीर आरोप
निवडणूक आयोगाने काही जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत पराभव लक्षात येताच निवडणूक आयोगाला हाताशी धरून २ डिसेंबर २०२५ रोजी होणारी निवडणूक रद्द करण्यात आली, असा आरोप शिंदेसेनेने भाजपावर केला आहे. निवडणूक पुढे ढकल्याने त्याचा मोठा त्रास हा उमेदवार व मतदार राजाला होणार आहे, त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाचा जाहीर निषेध करत आहोत, अशी बॅनरबाजी शिंदे गटाने अंबरनाथमध्ये केली आहे. अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत भाजपा विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा सामना रंगला आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी मांडलेले प्रमुख मुद्दे :#Shivsena #Eknathshinde pic.twitter.com/GMu40oAqI9
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) December 3, 2025
२. मातोश्रीवर ठाणे, मुंबईतील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश
शिंदे गटातील अनेक पदाधिकारी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश करीत आहेत. गेल्या दोन दिवसांत शिंदेंच्या १०० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची कास धरली आहे. त्यामुळे मातोश्रीवर पक्षप्रवेशांची लगबग दिसून येत असून कार्यकर्त्यांची गर्दी वाढत आहे. एकनाथ शिंदे यांचा गड मानल्या जाणाऱ्या ठाण्यातील उपविभाग प्रमुख आबा मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर शिंदेंच्या कोपरी-पाचपाखडी मतदारसंघातील जवळपास १०० कार्यकर्ते ठाकरे गटात दाखल झाले आहेत. त्याशिवाय शिंदे गटाचे नवी मुंबईतील सहसंपर्क प्रमुख शिरीष पाटील यांनीदेखील आपल्या शेकडो समर्थकांसह मशाल हाती घेतली आहे.
नवी मुंबईतील शिंदे गटाचे सहसंपर्कप्रमुख शिरीष काशिनाथ पाटील, उपविभागप्रमुख मयूर ठाकूर आणि संदिप साळवे ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते… pic.twitter.com/BkMcmSfX8v
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 3, 2025
३. अंबादास दानवेंचे सरकारला चार महत्वाचे प्रश्न
पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणावरून अंबादास दानवेंनी महायुती सरकारला काही महत्वाचे प्रश्न विचारले आहेत. पुण्याच्या जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला अखेर अटक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जी, या प्रश्नांची उत्तरे जनता मागते आहे, अशी पोस्ट दानवेंनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून केली आहे. जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही? पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर देण्यासाठी अजून किती दिवस ‘मुदतवाढ मुदतवाढ’ खेळणार आहात? अमेडिया कंपनीत केवळ १ टक्का भागधारक दिग्विजय हा ९९ टक्के भागधारक असलेल्या पार्थ पवारांच्या मर्जीशिवाय सायनिंग अथॉरिटी झाला का? मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सरकार कधी जाहीर करणार? ही शुल्क माफी राजकीय दबावाशिवाय होणे शक्य नाही महोदय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याची कल्पना नाही असे सांगणे, हे जनतेला शुद्ध वेडे बनवणे आहे. ते ही बहुमताच्या जोरावर, अशी टीकाही दानवे यांनी पोस्टमधून केली आहे.
पुण्याच्या जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला ‘अखेर’ अटक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जी, या प्रश्नांची उत्तरे जनता मागते आहे..
१. जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही?
२. पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर…— Ambadas Danve (@iambadasdanve) December 4, 2025
४. काँग्रेसची महायुती सरकारवर टीका..
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील गोंधळ हा निवडणूक आयोगाच्या अक्षमतेचा जिवंत पुरावा आहे. आता निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन नगरपालिका निवडणुकांचा निकाल तीन तारखेऐवजी २१ तारखेला जाहीर होणार आहे. म्हणजेच १६-१७ दिवस मतयंत्रे शासकीय गोदामात पडून राहणार आहेत, असा संशय माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. ७३ आणि ७४ व्या घटनादुरुस्तीने नागरिकांना वेळेवर निवडणूक होण्याचा घटनात्मक अधिकार दिला, पण तो अधिकार भाजपा सरकारने आपल्या राजकीय स्वार्थासाठी पायदळी तुडवल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जो घोळ दिसून येत आहे आणि मतदारांमध्ये मनस्ताप निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाने केले आहे. निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग आणलाच पाहिजे. निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे.
: मा.श्री. नाना… pic.twitter.com/zf1PoMbbnb
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) December 3, 2025
५. राज ठाकरे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर..
मनसे अध्यक्ष राज ठाकरे अचानक दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. मात्र, त्यांच्या दिल्ली दौऱ्याचे कारण राजकीय नसून कौटुंबिक असल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली आहे. राज यांची सून मिताली ठाकरे यांचे बंधू डॉ. राहुल बोरुडे यांचा ५ डिसेंबर रोजी दिल्लीत विवाह पार पडणार आहे. या सोहळ्याला ठाकरे कुटुंबातील सर्वच नातेवाईक उपस्थित राहणार आहेत.
आज मा. राजसाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे नेते व खासदार श्री. संजय राऊत यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीचे काही क्षणचित्रे..#MNSAdhikrut pic.twitter.com/fB5QVGHmkV
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) December 3, 2025












