Umarkhed Urdu School Controversy : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील अब्दुल गफूर शाह नगरपरिषद उर्दू शाळा क्रमांक २ मध्ये (Abdul Ghafoor Shah Urdu School No.2) आयोजित स्नेहसंमेलनात (Annual get-together) पाकिस्तानी देशभक्तीपर गीतावर गायन आणि नृत्य (Pakistani singing and dancing) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात “ये मर्द ये मुजाहिद, तेरी अल्गार क्या है” हे गाणे गायले गेले आणि त्यावर नृत्य करण्यात आले. हे गाणे पाकिस्तानसाठी लष्करी स्फूर्तीगीत (Pakistan military anthem) म्हणून ओळखले जाते, जे देशभक्तीचा भाव जागृत करणारे आहे. शाळेच्या कार्यक्रमात अशा प्रकारचे पाकिस्तानी गाणे गायन आणि नृत्य करणे अनेकांची भावना दुखावणारे आणि देशद्रोही आहे. या प्रकरणी दोषी शिक्षक आणि संबंधित पदाधिकाऱ्यांवर (The guilty teacher and the officials involved) तातडीने देशद्रोहाचे गुन्हे दाखल (Demand to file sedition charges) करावेत, अशी मागणी भाजप नेते गोपाळ कलानी (BJP leader Gopal Kalani) यांच्याकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा-
या कार्यक्रमात ‘ए मर्द-ए-मुजाहिद तेरी यलगार कहाँ है’ या गीतावर विद्यार्थ्यांकडून नृत्य करून घेण्यात आले. हे गीत १९६५ च्या भारत-पाक युद्धादरम्यान पाकिस्तानने आपल्या सैनिकांना आणि नागरिकांना भारताविरुद्ध भडकवण्यासाठी वापरले होते, असा आरोप भाजपने केला आहे. हे गीत आजही पाकिस्तानात लष्करी आणि राष्ट्रीय समारंभात गायले जाते. यामुळे स्थानिक पातळीवरून निषेधाची लाट उसळली असून, सोशल मीडियावरही या घटनेची जोरदार चर्चा होत आहे.
चिथावणीखोर शब्द असलेल्या या गीतावर भारतात बंदी
भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारे आणि चिथावणीखोर शब्द असलेल्या या गीतावर भारतात बंदी असल्याचे सांगण्यात येत आहे. निरागस विद्यार्थ्यांच्या मनावर देशविरोधी विचार रुजविण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न शाळेकडून करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शासकीय शाळेत अशा प्रकारचे धार्मिक आणि प्रक्षोभक गीत वाजवणे हे संविधानाच्या अनुच्छेद २८ चे उल्लंघन आहे. या गीताद्वारे तलवार उचलण्याची भाषा करून लोकांना उग्र आंदोलनासाठी प्रेरित केले जात असल्याचाही आरोप कलाणी यांच्याकडून करण्यात आला आहे.
शिक्षक व पदाधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी
शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात देशविरोधी गीतावर नृत्याचा हा प्रकार करण्यामागे मोठी विचारधारा काम करत आहे. शासकीय शाळेत जर असे शिक्षण दिले जात असेल, तर त्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेनुसार फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही गोपाळ कलाणी यांनी केली आहे.












