200
नवी मुंबईतील सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. दिव्याज फाउंडेशनच्या वतीने आयोजित वेलनेस कॅम्पमध्ये सहभागी होऊन फडणवीस यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी मराठी माणसाच्या एकतेवर भर देत, “बाहेरून येणाऱ्यांचा सामना करायला मराठी माणूस एकत्र आहे,” अशी घोषणा केली.









