Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • श्रीलंकेत विध्वंस केल्यानंतर चक्रीवादळ दित्वा भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर; विमानासह रेल्वेसेवा विस्कळीत
Top News

श्रीलंकेत विध्वंस केल्यानंतर चक्रीवादळ दित्वा भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर; विमानासह रेल्वेसेवा विस्कळीत

Cyclone Ditva India : श्रीलंकेत प्रचंड विनाश केल्यानंतर, चक्रीवादळ दित्वा आता भारताच्या दक्षिण किनाऱ्याजवळ वेगानं येत आहे. हवामान खात्याच्या मते, 30 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत हे वादळ उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ नैऋत्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे. दित्वा चक्रीवादळ दक्षिण भारताच्या किनाऱ्याजवळ वेगानं येत आहे. ते उत्तर-वायव्य दिशेनं सरकत आहे आणि उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यांवरुन रविवारपर्यंत नैऋत्य बंगालच्या उपसागरात पोहोचेल. हवामान खात्यानं माहिती दिली आहे की दितवाह किनाऱ्याजवळून जाईल; ते रविवारी सकाळी 50 किलोमीटर अंतरावर आणि रविवारी संध्याकाळी 25 किलोमीटर अंतरावर किनारपट्टी ओलांडेल.

रेड अलर्ट जारी :

वादळाच्या प्रभावामुळं संपूर्ण भारतात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तामिळनाडूतील चार जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या मते, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुडुचेरी या राज्यांना या वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर पूर आणि भूस्खलनामुळं हाहाकार; मृतांची संख्या 250 पेक्षा जास्त

तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये परिणाम, विमानसेवा रद्द, एनडीआरएफ तैनात :

चक्रीवादळाच्या प्रभावामुळं, तामिळनाडूच्या अनेक किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे सुरु झाले आहेत. पुडुचेरीमध्ये, जोरदार वारे आणि भरती-ओहोटीमुळं एक पूल कोसळला आहे. किनारी भागात उच्च भरती-ओहोटी, जोरदार वारे आणि पाऊस सुरुच आहे. तामिळनाडूमधील रामनाथपुरम आणि नागपट्टिनम जिल्हे सर्वात जास्त प्रभावित झाल्याचं वृत्त आहे.

अनेक उड्डाणं रद्द, रेल्वेही विस्कळीत :

चक्रीवादळाच्या प्रभावामुळं चेन्नई विमानतळावर 35 हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. अनेक रेल्वे मार्ग आणि वेळापत्रकांवरही परिणाम झाला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि रेल्वे सेवांमध्ये होणारा व्यत्यय कमी करण्यासाठी तयारीचा आढावा घेतला. गंभीर चक्रीवादळाच्या परिस्थिती लक्षात घेता, एनडीआरएफच्या सहाव्या बटालियनमधील पाच पथकांना गुजरातमधील वडोदरा येथून चैन्नईला विमानानं हलवण्यात आलं आहे. या पथकांमध्ये पूरपाणी बचाव (एफडब्ल्यूआर) आणि सीएसएसआर उपकरणे पूर्णपणे सुसज्ज आहेत.

श्रीलंकेत प्रचंड विध्वंस, 153 जणांचा मृत्यू :

भारताकडे वाटचाल करण्यापूर्वी, चक्रीवादळ दित्वानं शेजारच्या श्रीलंकेत कहर केला. सरकारी आकडेवारीनुसार, श्रीलंकेत आतापर्यंत 153 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 171 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. हजारो लोक बेपत्ता देखील झाले आहेत. या परिस्थितीमुळं, राष्ट्रपती दिसानायके यांनी श्रीलंकेत आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे आणि लष्कर आणि मदत संस्थांना जलदगतीनं कार्य करण्याचे आदेश दिले आहेत. भारतानं श्रीलंकेत 27 टन मदत साहित्य आणि बचाव पथकं पाठवली आहेत आणि कोलंबो विमानतळावर अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठी एक आपत्कालीन हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts