Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • पक्ष स्थापना दिनी नितीन गडकरींचा सूचक वार; म्हणाले, “कुणाला पंतप्रधान करण्यासाठी…”
Top News

पक्ष स्थापना दिनी नितीन गडकरींचा सूचक वार; म्हणाले, “कुणाला पंतप्रधान करण्यासाठी…”

Nitin Gadkari | आज (7 एप्रिल) भारतीय जनता पक्षाला (BJP) 46 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने नागपूरमध्ये (Nagpur) भाजपचा स्थापना दिवस (BJP Foundation Day) साजरा करण्यात आला. तर या कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जोरजार फटकेबाजी केली. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत नितीन गडकरींनी नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे कान टोचले. सत्ता मिळाली म्हणून माज दाखवू नका, असं खोचक वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे.

हेही वाचा – बारामतीची लढत रंगणार; काँग्रेसच्या उमेदवारीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “काँग्रेसच्या तालमीत…”

नितीन गडकरींनी काय केला सूचक वार? कार्यकर्त्यांचे टोचले कान

नितीन गडकरींनी आपल्या भाषणात जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, पक्षाचा खरा कणा हा कार्यकर्ता असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या कष्टावरच भाजपने मोठी प्रगती केली आहे. मात्र, काही लोकांना दिवसरात्र फक्त निवडणुकाच दिसत असतात. ते सतत माझं काय होणार, मला संधी मिळणार का, याच विचारात असतात. पण आम्ही त्यांना काही संधी द्यायला आलेलो नाही. आम्ही समाज बदलायला आलो आहोत, हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे, असं नितीन गडकरी म्हणाले.

राजकारणात जशी पिढी बदलते तसेच नेतृत्व देखील बदलते. पण, नेतृत्वाच्या पोटातून कधीही नवीन नेतृत्व समोर येता कामा नये. नवीन नेतृत्व हे कार्यकर्त्यांमधून घडायला हवे. जरी सत्ता मिळाली तरी माज दाखवू नता. कारण जो खुर्चीवर बसतो तो कधीतरी त्यावरून उठणारच आहे. जर तो उठला नाही तर देव त्याला घेऊन जाईलच, असा खोचक टोला नितीन गडकरींनी लगावला.

पुढे नितीन गडकीरींनी पंतप्रधानपदाबाबत सूचक वक्तव्य केलं. ते म्हणाले की, 40 वर्षांपूर्वी भाजपची स्थापना झाली. न्यू इंग्लीश महाल येथे राम जेठमलानी आणि शांतीभूषण यांच्या उपस्थितीत भाजपची स्थापना झाली होती. त्यावेळी मुंबईमध्ये अधिवेशन झालं होतं. त्यादरम्यान छागला यांनी सांगितलं होतं की, भावी पंतप्रधान येणार आहेत आणि ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या रूपाने सिद्ध झाले. अटल बिहारी यांनी अंधार मिटणार अशी भविष्यवाणी केली होती आणि आज ती खरी ठरली आहे.

भाजपची स्थापना पंतप्रधान बनवण्यासाठी झाली नाही, असा सूचक वार नितीन गडकरींनी केला. तसेच ते पुढे म्हणाले की, अटल बिहारी सांगत होते की, देशाचे पंतप्रधान कोण होणार? हे महत्त्वाचं नाही, तर आपला देश कसा मजबूत होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आमचा पक्ष हा कोणत्याही धर्म विरोधात नाही, जातीवादी नाही. आम्ही अनेक स्वप्न, उद्दिष्ट पूर्ण केले आहेत, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts