Uddhav Thackeray: शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातील अलीकडील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज ‘मातोश्री’ येथे पक्षाच्या आमदारांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पक्षातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील रणनीती निश्चित करण्यासाठी ही बैठक महत्वाची मानली जात आहे.
खासदारांच्या पक्षांतरानंतर हालचालींना वेग
अलीकडेच पक्षातील सहा खासदारांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्याआधी या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वत्रंत गटासंदर्भात पत्र दिल्याची चर्चा होती. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या घडामोडींनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संबंधित मतदारसंघांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि पक्षाची भूमिका मंडळण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा: पुण्यातील 101 महापालिका शाळांना अचानक सुट्टी; कारण जाणून तुम्हालाही वाटेल अभिमान
आज ‘मातोश्री’वर आमदारांची बैठक
पक्षातील ताज्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी 7 वाजता ‘मातोश्री’ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत पक्ष संघटना, आगामी राजकीय रणनीती आणि सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
पक्षातील चर्चांना उधाण
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील काही आमदारांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहेत. मात्र, याबाबत पक्षाकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आमदारांशी थेट संवाद साधून पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बैठकीकडे राजकीयवर्तुळाचे लक्ष
पक्षातील अलीकडील घडामोडींनंतर आज होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या बैठकीत कोणते निर्णय घेतले जातात, उद्धव ठाकरे आमदारांना कोणता संदेश देतात आणि पुढील राजकीय दिशा काय असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.










