Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • शैक्षणिक बातम्या
  • मुंबईत मोठ्या पॅकेजची नोकरी, पण मराठी उमेदवारांना संधी नाही? जाहिरात व्हायरल होताच वाद पेटला
Mumbai

मुंबईत मोठ्या पॅकेजची नोकरी, पण मराठी उमेदवारांना संधी नाही? जाहिरात व्हायरल होताच वाद पेटला

Viral Job Advertisement

Viral Job Advertisement Sparks Controversy in Mumbai: मुंबईतील एका नोकरीच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. एका खासगी कंपनीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य दिल्याचा दावा केला जात असून, यावरून अनेकांनी आक्षेप नोंदवले आहेत. चालतर जाणून घेऊयात नेमका काय प्रकरण आहे.

सध्या मुंबईतील एका खासगी कंपनीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य दिल्याचा दावा केला जात आहे. एका भरती एजन्सीमार्फत व्यावसायिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर वरिष्ठ पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदासाठी वार्षिक वेतन सुमारे २५ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले होते.

हेही वाचा: आईच्या डोळ्यातील अश्रू अन् आंदोलनाचा निर्धार; अभिजीत दीपके नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या

मात्र, जाहिरातीतील पात्रता निकषांमध्ये स्पष्ट म्हटले नमूद केले होते की गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य देण्यात आल्याचा उल्लेख असल्याचे स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर या भरती प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले.

सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया

जाहिरात समोर आल्यानंतर विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. रोजगाराच्या संधी सर्व पात्र उमेदवारांसाठी समान असाव्यात आणि जात, भाषा किंवा समुदायाच्या आधारे कोणताही भेदभाव होता कामा नये, अशी भूमिका अनेकांनी मांडली.

चौकशीची मागणी

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जाहिरात नेमकी कोणी प्रसिद्ध केली, तसेच त्यामागील धोरण काय होते, याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी काही संघटनांकडून करण्यात आली आहे. संबंधितांवर आवश्यक ती कारवाई व्हावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.

राजकीय प्रतिक्रिया

या विषयावर काही राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली असून, मुंबईसारख्या बहुसांस्कृतिक शहरात रोजगाराच्या संधी देताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये, असे मत व्यक्त केले आहे.

रोजगार क्षेत्रातील समान संधींचा मुद्दा पुन्हा चर्चेत

या घटनेमुळे रोजगार क्षेत्रातील समान संधी, भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि भाषिक किंवा सामाजिक आधारावरील भेदभाव या मुद्द्यांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर अनेक जणांनी गुणवत्तेच्या आधारेच उमेदवारांची निवड व्हावी, अशी भूमिका घेतली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts